मायकेल क्‍लार्क, माईक हसीने पिसं काढलीत

ऑस्ट्रेलियाच्या मायकेल क्‍लार्क आणि रिकी पॉंटिंग यांनी टीम इंडियाच्या बॉलर्सला धुतले असतानाच माईक हसीनेही तोच कित्ता गिरवला. त्याने शतक झळकावून संघाला चांगली धावसंख्या उभारण्यास हातभार लावला. आता तर क्लार्क यांने शतकांवर शतक करण्याचा विक्रम करीत आहे. तो त्रीशतकाच्या जवळ पोहोचला आहे. क्‍लार्क २९३ तस हसी १११ रन्सवर असून खेळपट्टीत पाय रोवून आहेत.

Updated: Jan 5, 2012, 09:04 AM IST

मॅचचा LIVE स्कोर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

www.24taas.com ,सिडनी

 

ऑस्ट्रेलियाच्या मायकेल क्‍लार्क आणि रिकी पॉंटिंग यांनी टीम इंडियाच्या बॉलर्सला धुतले असतानाच माईक हसीनेही तोच कित्ता गिरवला. त्याने शतक झळकावून संघाला चांगली धावसंख्या उभारण्यास हातभार लावला. आता तर क्लार्क यांने शतकांवर शतक करण्याचा विक्रम करीत आहे. तो त्रिशतकाच्या जवळ पोहोचला आहे.  क्‍लार्क २९३ तर हसी १११ रन्सवर असून खेळपट्टीत पाय रोवून आहेत.

 

 

ज्या खेळपट्टीवर पहिल्या दिवशी १३ बॅटमन्स बाद झाले, त्याच खेळपट्टीवर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी फक्त अवघा एकच बॅटमन्स बाद झाला. सिडनी मायकेल क्‍लार्क आणि रिकी पॉंटिंग या आजी-माजी कर्णधार; तसेच माईक हसीच्या जोरदार खेळाने ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यावरही दुसऱ्याच दिवशी मजबूत पकड मिळविली.  ही पकड तिसऱ्या दिवशीही कायम आहे. मायकेल क्‍लार्कचे नाबाद व्दिशत (२५१ रन्स) झळकावल्यानंतर तो मैदानावर पहाडासारखा उभा आहे. त्यांने २९३ रन्स केल्या असून केवळ सात पावलं तो त्रिशतकापासून दूर आहे.

 

 

रिकी पॉंटिंगचे (१३४) शतक आणि त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या २८८ रन्सच्या भागीदारीने  टीम इंडियाच्या बॉलर्सच्या उणिवा साफ उघड्या पडल्या. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पॉंटिंग आणि क्‍लार्क या आक्रमक शैलीच्या फलंदाजांनी लौकिकाला साजेसा खेळ करताना ऑस्ट्रेलियन संघाची सामन्यावरील पकड मजबूत केली. दिवसभरातील ९०  षटकांच्या खेळात ३६६ रन्स काढल्या गेल्या आणि  टीम इंडियाच्या  बॉलर्सना केवळ रिकी पॉंटिंगला बाद करण्यात यश आले. अर्थात, तोपर्यंत क्‍लार्क-पॉंटिंग जोडीने  टीम इंडियाचे सामन्यातील अस्तित्वच जणू संपुष्टात आणले होते.

 

 

पॉंटिंग बाद झाल्यावर खेळायला आलेल्या माईक हसीनेदेखील (नाबाद ५२) अर्धशतकी खेळी करताना टीम इंडियाच्या बॉलर्सच्या अपयशावर मीठच चोळले. दुसऱ्या दिवसअखेरीस ऑस्ट्रेलियाने ४  बाद ४८२ धावांची मजल मारताना २९१ रन्सची आघाडी मिळविली. ऑस्ट्रेलियाच्या या आघाडीने दुसऱ्याच दिवशी जणू भारताच्या सलग दुसऱ्या पराभवाची नांदी दिली आहे.

 

ऑस्ट्रेलिया -  583/4 (148.0 ov)

टीम इंडिया (पहिला डाव) -  191