महाराष्ट्राचे ग्रह फिरले आहेत!

राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती आणि त्यास प्रशासनाची साथ असल्यास राज्यात काय होऊ शकते याचे गुजरात हे आदर्श उदाहरण ठरावे , असे राज म्हणाले

Updated: Oct 9, 2011, 12:17 PM IST

[caption id="attachment_259" align="alignleft" width="300" caption="राज ठाकरे"][/caption]

झी 24 तास वेब टीम

 

टाटांच्या ' नॅनो ' प्रकल्पाच्या पाठीशी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी उभे राहिले , त्यासाठी तातडीने परवानगी दिली , असे योग जुळून यावे लागतात . व्यवसाय उद्योगांसाठी महाराष्ट्रातही यापूर्वी असेच योग जुळून आले होते , परंतु आता नेमके कोणते ग्रह फिरलेत तेच कळत नाही , अशी मल्लिनाथी गुजरात दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी येथील ' नॅनो ' प्रकल्पास भेट दिल्यावर केली .

 

' नॅनो ' प्रकल्प महाराष्ट्रात आला नाही , याचे दु : ख वाटते आणि त्याचवेळी ' बरे झाले , टाटा महाराष्ट्राच्या भानगडीत पडले नाहीत , असेही वाटते . तेथे त्यांना पैसेही खायला घालावे लागले असते आणि परवानगीही ताबडतोब मिळाली नसती ' असा टोला लगावत , ' आमच्याकडे मुख्यमंत्री भेटत नाहीत ही वस्तुस्थिती आहेच ', अशी पुस्ती राज यांनी जोडली .

 

गुजरातमध्ये अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काम सुरू आहे . खासगी कंपन्यांप्रमाणे हे सरकार नियोजनबद्ध काम करीत आहे . राजकारणी आणि प्रशासन एकमेकांत मिसळून राज्याच्या हिताचा विचार करत आहेत . इतरत्र यापेक्षा विरुद्ध चित्र दिसते . राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती आणि त्यास प्रशासनाची साथ असल्यास राज्यात काय होऊ शकते याचे गुजरात हे आदर्श उदाहरण ठरावे , असे राज म्हणाले .

 

गुजरात अभ्यास दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी , गुरुवारी राज यांनी साबरमती नदी विकास प्रकल्प , अहमदाबाद मधील ' जनमार्ग बीआरटीस ' आणि ' नॅनो ' प्रकल्पाची पाहणी केली . तसेच साणंद तालुक्यातील वासणा गावास भेट देऊन सुरक्षित मातृत्वासाठी असलेल्या चिरंजीवी योजनेचीही माहिती घेतली . अहमदाबाद मधील कांकरिया तलावाच्या सुशोभिकरणाचे कामही त्यांनी पाहिले .

 

सीईओ नव्हे विश्वस्त !

मला महाराष्ट्रच प्रिय आहे ; पण गुजरात पुढे जात आहे हे वास्तवच आहे . गुजरातच्या विकासाचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे एखाद्या कंपनीच्या सीईओप्रमाणे नव्हे तर एखाद्या ट्रस्टच्या विश्वस्ताप्रमाणे काम करीत आहेत . हा मोठा फरक आहे . त्यास जनसहभागाची जोड आहेच , परंतु मुळात राज्यकर्त्यांनाही हा आपला प्रदेश आहे , हे आपले राज्य आहे याची जाणीव आहे , असे निरीक्षण ठाकरे यांनी नोंदवले .

 

पुण्यात कुठे आहे कंट्रोल रुम ?

अहमदाबादमध्ये बीआरटीएस यशस्वी ठरली कारण त्याचे नियोजन त्या रीतीने करण्यात आले . केवळ रस्त्याच्या मध्यभागी बॅरिकेड्स टाकून , बसगाड्या खरेदी करून उपयोग नाही . अहमदाबादप्रमाणे पुण्यात बीआरटीएसची कंट्रोल रूम कुठे आहे ? तेथे फक्त पैसे किती खाता येतील याचाच विचार दिसतो , अशी टिप्पणी राज यांनी केली .

 

गोदापार्क ते साबरमती

साबरमतीच्या तिरावर होत असलेले विकास प्रकल्पाचे काम पाहून ठाकरे यांना त्यांचे स्वप्न असलेल्या नाशिकमधील ' गोदा पार्क ' चे स्मरण झाले . त्याचवेळी या प्रकल्पाचे एम . डी . आणि अहमदाबाद पालिकेचे उपायुक्त कॅ . दिलीपकुमार महाजन यांनी साबरमतीचे काम सुरू करण्यापूर्वी गोदा पार्कला भेट दिल्याचे सांगितले . आपण जेव्हा ते काम करत होतो तेव्हा अनेकांना त्याचे गांभीर्य कळले नाही , कारण त्यात पैसे खायला वाव नव्हता . बरेच अडथळे आणले गेलेे . परंतु आता साबरमतीसाठी तेच काम पाहिले याचा मला आनंद वाटतो , असे राज म्हणाले .