'आसाममधील हिंसाचाराला बांग्लादेशीच जबाबदार!'

भाजपाचे ज्येष्ठ नेते लाल कृष्ण आडवाणी यांनी मंगळवारी आसाममधील जातीय दंगल आणि हिंसाचारासाठी बांग्लादेशी प्रवाशांना जबाबदार धरलं आहे. आडवाणी सध्या आसामच्या दौऱ्यावर आहेत.

Updated: Aug 1, 2012, 09:34 AM IST

www.24taas.com, गुवाहाटी

 

भाजपाचे ज्येष्ठ नेते लाल कृष्ण आडवाणी यांनी मंगळवारी आसाममधील जातीय दंगल आणि हिंसाचारासाठी बांग्लादेशी प्रवाशांना जबाबदार धरलं आहे.  आडवाणी सध्या आसामच्या दौऱ्यावर आहेत. येथे पत्रकारांशी संवाद साधताना आडवाणी यांनी सरकारला धारेवर धरलं. बोडो आणि बांग्ला भाषक मुस्लिम प्रवासी यांच्यात १९ जुलैपासून चालू असणाऱ्या हिंसाचारात आत्तापर्यंत ५६ लोक मारले गेले आहेत, तर लाखो लोक बेघर झाले आहेत.

 

राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या संगनमतानेच आसाममध्ये घुसखोरी चालू आहे. यामुळे आसामचे भूमीपुत्र स्वतःला अनाथ मानू लागले आहेत. मात्र अवैध बांग्लादेशींना मुबलक प्रमाणात जमीन उपलब्ध करून दिली जात आहे.

 

आडवाणी म्हणाले की दुसरी समस्या ही जातीय समस्या आहे. बोडो आपल्याच जमिनीवर कोपऱ्यात ढकलले जात आहेत. याशिवाय आसाममधील बदलता लोकप्रवाह हीदेखील एक समस्या आहे.