शाहरूख-फराह खानमध्ये पॅचअप

शाहरूख खान आणि फराह खान यांच्यात अखेर पॅचअप झाले आहे. मात्र, या दोघांनी काही समेट घडवून आणलेले नाही. किंग खान आणि फराह यांच्यात पुन्हा मैत्रिचा हात पुढे करण्यासाठी साजिद खान यांने एक पाऊल पुढे केले. साजिदने आपल्या बहिणीसाठी हे पाऊल उचल्याचे बोलले जात आहे.

Updated: Apr 3, 2012, 04:24 PM IST

www.24taas.com,मुंबई

 

 

शाहरूख खान आणि फराह खान यांच्यात अखेर पॅचअप झाले आहे. मात्र, या दोघांनी काही समेट घडवून आणलेले नाही. किंग खान आणि फराह यांच्यात पुन्हा मैत्रिचा हात पुढे करण्यासाठी साजिद खान यांने एक पाऊल पुढे टाकले आहे. साजिदने आपल्या बहिणीसाठी हे पाऊल उचल्याचे बोलले जात आहे. आगामी 'कन्यादान' चित्रपटात या दोघांना घेऊन साजिद काम करणार असल्याचे त्यांने सांगितले.

 

 

एका प्रमुख दैनिकाला साजिद खानने मुलाखत दिली. त्यावेळी ही बाब उघड झाली. ‘हाऊसफुल २’च्या मुलाखतीत ही बाब साजिदने स्पष्ट केली आहे. साजिदला या दोघांना घेऊन 'कन्यादान' हा चित्रपट काढायचा आहे. या चित्रपटासाठी या दोघांची साजिदला गरज आहे. आपला व्यावसायिकपणा जपण्यासाठी आणि या दोघांमधील वैर पुढे आर्थिक नुकसान करू शकते, यांची खात्री पटल्याने साजिदने समजदारी दाखवत आपल्या माध्यमातून मैत्रिचा मिलाप घडवून आणला. साजिदच्या म्हणण्यानुसार दोघांमध्ये बोलण्याबाबत काही समस्या नव्हती. त्यांनी ते थांबविलेले नव्हते. कोणीतरी या दोघांबाबत अफवा पसरवल्या आहेत.

 

 

फराह खानच्या नवऱ्याला शाहरूखने एका पार्टीत मारहाण केली होती. शाहरूख आणि शिरीष कुंद्रा प्रकरणानंतर फराह आणि शाहरूख यांच्यात वितुष्ट आल्याच्या बातम्या होत्या. मात्र, यात तथ्य नसल्याचे साजिदने म्हटले आहे. शाहरूख आणि आमच्यात कौटुंबिक संबंध चांगले आहेत. शाहरूखची पत्नी मला राखी बांधते. ती मला भाऊ मानते. शाहरूख आणि फराह यांच्यात  'कन्यादान'च्या निमित्ताने मैत्रीते नाते पुन्हा जोडले  जाणार आहेत. त्यामुळे दोन्ही कुटुंबांत चांगले आणि सलोख्याचे संबंध असल्याचे साजिद खानने दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. मात्र, शाहरूख आणि फराह या दोघांनी आमचे समेट झाल्याचे कुठेही म्हटलेले नाही. त्यामुळे हे साजिदचे म्हणणे असू शकते, अशी चर्चा बॉलिवूडमध्य़े आहे.