दहशतीच्या सावटाखाली मंत्रिमंडळात जायचे का? खोचक टोला

दहशतीच्या सावटाखाली मंत्रिमंडळात जायचे का याविषयी गोंधळ पडल्याचा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी मारला. 

Updated: Sep 2, 2017, 06:42 PM IST
दहशतीच्या सावटाखाली मंत्रिमंडळात जायचे का? खोचक टोला title=

मुंबई : रविवारी होणा-या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराविषयी शिवसेनेला कुठलही विचाराणा किंवा सूचना देण्यात आलेली नाही. आणि देण्यात आली तरी दहशतीच्या सावटाखाली मंत्रिमंडळात जायचे का याविषयी गोंधळ पडल्याचा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी मारला. 

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. शिवसेनेनंही याविषयी कुठलीही मागणी केलेली नाही असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलंय.  एआयडीएमके आणि जेडीयूमुळे भाजप बळकट झालीये. त्यात शिवसेनेसोबत कम्युनिकेशन गॅप वाढलाय.. त्यामुळे आता शिवसेना मंत्रिपदासाठी भाजपकडे मागणी करणार का याकडे लक्ष लागलंय.