मालाडच्या हॉटेलवर शिवसेना नेत्यांची वर्दळ वाढली; मुंबईतील हालचालींना पुन्हा वेग

थोड्याच वेळात आमदारांशी संवाद साधणार?

Updated: Nov 9, 2019, 08:32 PM IST
 मालाडच्या हॉटेलवर शिवसेना नेत्यांची वर्दळ वाढली; मुंबईतील हालचालींना पुन्हा वेग title=
संग्रहित फोटो

मुंबई : राज्यपालांनी सर्वात मोठा म्हणून भाजपला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिल्यानंतर राजकीय हालचालींना पुन्हा एकदा वेग आला आहे. मालाडच्या हॉटेलवर शिवसेना नेत्यांची वर्दळ वाढली आहे. यामध्ये मिलिंद नार्वेकर, आदेश बांदेकर आणि अनिल देसाई उपस्थित राहणार असून, गजानन किर्तीकर, रामदास कदम यांचा समावेश आहे. थोड्याच वेळात हे नेते आमदारांशी संवाद साधणार असल्याचं बोललं जात आहे. 

आमदार फुटण्याच्या भीतीने शिवसेनेच्या आमदारांना मढ बीचवर हलवण्यात आले होते. या आमदारांना बीचवर आनंद लुटताना पाहण्यात आलं. आमदार प्रताप सरनाईक, गुलाबराव पाटील आणि चंद्रकांत पाटील मढच्या बीचवर सेल्फी घेण्यात मग्न होते. मढला रवाना करण्यापूर्वी सेनेचे आमदार मुंबईतील रंगशारदा हॉटेलवर वास्तव्यास होते. मात्र सत्तासंघर्ष शिगेला पोहचताच सेनेनं आपल्या आमदारांना मढ बीचवर पाठवून दिलं.

 दरम्यान उद्या भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. त्यानंतर भाजप सत्तास्थापनेचा दावा करण्याबाबत, पुढचं पाऊल टाकण्याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे. 

  

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तास्थापनेचे आमंत्रण दिल्याची माहिती समोर येत आहे. विधानसभेची मुदत संपायला अवघे काही तास शिल्लक असताना राज्यपालांकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.