ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात भाजप-शिंदे गटानं धुराळा उडवला; 'या' बड्या नेत्यांना बसला जबरदस्त धक्का

7751 पैकी भाजप आणि शिंदे गटाकडे 2770 ग्रामपंचायती आल्या आहेत. महाविकास आघाडी 2590 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत.  राष्ट्रवादी तिस-या स्थानी असून काँग्रेसची पिछेहाट झाल्याचे निकालात पहायला मिळाले. ग्रामपंचायत निवडणुकीच्या  निकालात अनेक बड्या नेत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. 

Updated: Dec 20, 2022, 08:18 PM IST
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात भाजप-शिंदे गटानं धुराळा उडवला; 'या' बड्या नेत्यांना बसला जबरदस्त धक्का title=

Gram Panchayat Election Result 2022 : ग्रामपंचायत निवडणुकीच्या  निकालात(Gram Panchayat Election Result ) भाजप-शिंदे गटानं(BJP, Shinde group ) धुराळा उडवला आहे. आतापर्यंतच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात भाजप-शिंदे गटाचं वर्चस्व पहायला मिळालं आहे.   शिंदे गट दुस-या स्थानी तर ठाकरे गट चौथ्या स्थानी आहे. आतापर्यंतच्या निकालात भाजपने सरशी मारली आहे.  7751 पैकी भाजप आणि शिंदे गटाकडे 2770 ग्रामपंचायती आल्या आहेत. महाविकास आघाडी 2590 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत.  राष्ट्रवादी तिस-या स्थानी असून काँग्रेसची पिछेहाट झाल्याचे निकालात पहायला मिळाले. ग्रामपंचायत निवडणुकीच्या  निकालात अनेक बड्या नेत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. 

शिंदे-फडणवीसांकडून ग्रामपंचायत निवडणूक विजयाचा जल्लोष करण्यात आला. एकमेकांना पेढे भरवून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. हा जनतेनं आमच्यावर दाखवलेला विश्वास आहे. यातून मतदारांनी विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली असंही शिंदे-फडणवीसांनी म्हंटल आहे.

या दिग्गज नेत्यांना बसला धक्का

  • साता-यातील कराड तालुक्यात अंतवाडीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला धक्का बसलाय..कराड अंतवडी ग्रामपंचायतीत माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलचा दणदणीत विजय झालाय..
  • सातारा तालुक्यात एकनाथ शिंदे गटाचे आमदार महेश शिंदेंच्या गटानं करिष्मा दाखवला..क्षेत्र माहुली ही महत्वाची ग्रामपंचायत ताब्यात घेतलीय..महेश शिंदे गटानं राष्ट्रवादीच्या ताब्यातून हिसकावलीय..
  • भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर ह्या पडळकरवाडीतून सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी झालेत...सांगली जिल्ह्याच्या पडळकरवाडीमध्ये भाजप प्रणित पॅनलचा एकतर्फी विजय झालाय..
  • नाशिकमध्ये आमदार दिलीप बनकर यांनी दहा वर्षांची सत्ता गमावलीय..आमदार बनकर यांचे पुतणे गणेश बनकर पराभूत झालेत..ठाकरे गटाचे भास्कर बनकर थेट सरपंचपदी विजयी झाले...तसेच भाजपचे सतीश मोर यांचाही पराभव झालंय.
  • अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतवर विखेंची सत्ता आलीये. 12 ग्रामपंचायतींवर भाजपाच्या विखेंचा झेंडा फडकलाय आणि त्यांनी या सगळ्या ग्रामपंचायतींवर एकहाती सत्ता मिळवलीय. स्थानिक पातळीवर विखे गटाच्या विरोधात विखे गटाचीच लढाई होती.
  • अहमदनगरमधील 203 ग्रामपंचायती निकालात भाजप 1 नंबरचा पक्ष ठरला. 14 तालुक्यांतल्या निकालात भाजपाने 74 ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावला. तर 68 ग्रामपंचायतींसह राष्ट्रवादी दुस-या स्थानी राहिली. काँग्रेसला 27 ग्रामपंचायतींवर सत्ता मिळाली. ठाकरे गटानं 19, तर शिंदे गटानं फक्त 1 ग्रामपंचायत जिंकली. 
  • कोल्हापूर ग्रामपंचायत निवडणुकीत धैर्यशील मानेंच्या चुलत भावाचा पराभव झालाय...हातकणंगले तालुक्यातील रूकडी ग्रामपंचायतीवर शिंदे गटाची सत्ता आली...पण, खासदार धैर्यशील माने यांच्या चुलत भावाचा पराभव झालाय...माजी उपसरपंच मोहन माने यांचा या निवडणुकीत पराभव झालाय...
  • कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये हसन मुश्रीफ गटाला मोठा धक्का बसलाय..कागल तालुक्यातील बामणीत सत्तांतर झालं असून समरजितसिंह घाटगे गटाचा विजय झाला आहे.
  • कोल्हापूरच्या आजरा तालुक्यात भाजपच्या बाजूने निकाल लागला...तसेच चितळे ग्रामपंचायतवर भाजपनं झेंडा रोवलाय.. सरपंच उमेदवार रत्नप्रभा भुतुले यांचा विजयी झालाय..
  • साताऱ्यातल्या ग्रामपंचायतींमध्ये शंभुराजेंनी प्रतिष्ठा राखलीय. पाटणमधील ८६ पैकी ६४ ग्रामपंचायतींवर उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांच्या पॅनेलनी विजय मिळवला. एकनाथ शिंदे गटाचा हा मोठा विजय आहे. तर राष्ट्रवादीच्या सत्यजितसिंह पाटणकर गटाला फक्त १९ ग्रामपंचायतींत विजय मिळाला. ठाकरे गटानं एकच ग्रामपंचायत जिंकली.
  • कंधारमध्ये सर्वाधिक ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आहे...आतापर्यंत अकरा ग्रामपंचायती भाजपकडे आलेत..दरम्यान विजयी उमेदवारांचा प्रणिता चिखलीकर पाटील यांनी सत्कार केला..

ग्रामपंचायत निवडणुकीत  सरासरी 74 टक्के मतदान झाले 

7 हजार 135 ग्रामपंचायतींचा निकाल हाती येणाराय. रविवारी या ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. यात सरासरी 74 टक्के मतदान झालं. यंदा मुंबई आणि उपनगर वगळता इतर ३४  जिल्ह्यातल्या एकूण 7 हजार 682 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली. पण काही ठिकाणी बिनविरोध निवड झाल्यानं 7 हजार 135 ग्रामपंचायतीत रविवारी प्रत्यक्ष मतदान झालं. विशेष म्हणजे यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंचपदासाठीही मतदान झालंय. त्यामुळं या ग्रामपंचायतीत कुणाचा झेंडा फ़डकतो, कुणाच्या नावानं गुलाल उधळला जातो हे बघणं महत्त्वाचं ठरेल. उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल.