जोरदार पावसामुळे संध्याकाळी मुंबईकरांची दैना

काही काळ विश्रांतीनंतर आज पावसानं पुन्हा जोर धरला. दोन दिवसांपूर्वीच मुसळधार पावसानं मुंबईकरांचं 

Updated: Sep 7, 2019, 10:49 PM IST
जोरदार पावसामुळे संध्याकाळी मुंबईकरांची दैना title=

दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई : काही काळ विश्रांतीनंतर आज पावसानं पुन्हा जोर धरला. दोन दिवसांपूर्वीच मुसळधार पावसानं मुंबईकरांचं जनजीवन विस्कळीत झालं होतं. या पावसाचा अनुभव मुंबईकरांना असल्यानं मुंबईकर धास्तावले आहेत. त्यातच आज गौरी गणपतीचं विसर्जन आहे त्यामुळे पावसाने उघडीप घेण्याची वाट गणेशभक्त पाहताना दिसत आहेत. मुंबईतील पावसाने रात्री ८ नंतर विश्रांती घेतली.

पश्चिम उपनगरात पावसाचा जोर दिसून आला. दुपारी सुमारे दोन ते अडिच तास आणि त्यानंतरही मुसळधार पाऊस बरसला. उत्तर मुंबईतल्या बोरिवलीमध्ये सखल भागात पाणी साचलं. तर दादर, परळ भागात अनेक ठिकाणी पाणी साचलं. दिवसभरात अधूनमधून मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.