'सामना'तून भाजप पुन्हा लक्ष्य, सलग दुसऱ्या दिवशी टीकास्त्र

भाजपवर सामनातून टीकास्त्र

Updated: Oct 26, 2019, 12:26 PM IST
'सामना'तून भाजप पुन्हा लक्ष्य, सलग दुसऱ्या दिवशी टीकास्त्र title=

मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून सलग दुसऱ्या दिवशी भाजपला लक्ष्य करण्यात आलंय. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपनं अब की बार २२० पारचा नारा दिला होता. मात्र महाराष्ट्राच्या जनतेनं भाजपाला १०५ जागांवरच कौल दिला. यावरूनच सामनामधून टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.

भाजपनं शिवसेनेसोबत अब की बार २२० पारचा नारा दिला होता. अशी प्रतिक्रिया सामनाच्या संपादकीयवर भाजप नेते गिरीश व्यास यांनी दिली आहे.

महाराष्ट्राच्या जनतेनं शिवसेना-भाजपा महायुतीच्या बाजूनं कौल दिला आहे. मात्र भाजपकडून दावा केला जात असलेल्या अब की बार २२० पारचा आकडा गाठण्यात अपयश आलं. यावरूनच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून भाजपावर टीका करण्यात आली होती.

शिवसेनेला सत्तेत आता मोठा वाटा हवा आहे. यासाठी शिवसेना आता ताणून धरण्याच्या मनस्थितीत आहे. शिवसेना सत्तावाटपाच्या १९९५ च्या फॉर्म्युल्यावर अडून बसली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेनं सत्तेत समान वाटणी मागून भाजपाची चांगलीच अडचण केली आहे. 

२०१४ मध्ये जी मंत्रिपदं भाजपनं दिली ती शिवसेनेनं मुकाटपणे घेतली. पण आता शिवसेना कुणाचंही ऐकायच्या मानसिकतेत नाही. सत्तेतल्या वाट्यासाठी शिवसेनेला १९९५ च्या फॉर्म्युला आदर्श वाटतो. मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडं, उपमुख्यमंत्रिपद गृहमंत्रिपद, अर्थ, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे खाते भाजपकडं होतं. या फॉर्म्युल्य़ानुसार शिवसेना कदाचित मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडू शकते, पण त्यासाठी शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद, गृहमंत्रिपद, अर्थखातं, सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा खात्यासारखी महत्त्वाची खाती हवी असल्याची चर्चा सुरु झाली आहे.