राज्यात आतापर्यंत कोरोनाचे ४४ हजार ५१७ रुग्ण बरे होऊन घरी परतले

महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९४०४१ पर्यंत वाढली आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात ३४३८ नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत.  

Updated: Jun 11, 2020, 06:19 AM IST
राज्यात आतापर्यंत कोरोनाचे ४४ हजार ५१७ रुग्ण बरे होऊन घरी परतले title=
संग्रहित छाया

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९४०४१ पर्यंत वाढली आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात ३४३८ नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. महाराष्ट्रातील कोरोना येथे गेल्या २४ तासांत १४९ मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना येथे मृतांचा आकडा आता ३४३८ आहे. महाराष्ट्रात बुधावाारी १८७९ रूग्णांना बरे झाल्यानंतर सुट्टी देण्यात आली. महाराष्ट्रात आतापर्यंत ४४५१७  रुग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना सोडण्यात आले आहे.

मुंबईत २४ तासात ९७ जणांचा मृत्यू

 मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५२६६७ पर्यंत वाढली आहे. मुंबईत गेल्या २४ तासात मुंबईतील कोरोनाचे ९७ मृत्यू झाले. मुंबईत कोरोना येथे आतापर्यंत एकूण १८५७ मृत्यू झाले आहेत.

धारावीत ११ नवीन रुग्ण

तसेच मुंबईतील धारावी येथे गेल्या २४तासात कोरोनाचे ११ नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह धारावीतील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या १९६४पर्यंत वाढली आहे. धारावीतील कोरोना येथे आतापर्यंत ७३ मृत्यूची नोंद झाली आहे. 

३२५४ नवीन रुग्णांचे निदान 

राज्यात बुधवारी १८७९ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ५१७ झाली आहे. दरम्यान,  बुधवारी कोरोनाच्या ३२५४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४६ हजार ७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ९३ हजार ७८४ नमुन्यांपैकी ९४ हजार ०४१ नमुने पॉझिटिव्ह (१५.८३ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ६९ हजार १४५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ७२७ खाटा उपलब्ध असून सध्या २७ हजार २२८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात काल १४९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.काल नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- १२२ (मुंबई ९७, ठाणे १५, नवी मुंबई ५, उल्हासनगर ३, वसई-विरार २), नाशिक- ५ (जळगाव ५), पुणे- १० (पुणे १०), औरंगाबाद-७ (औरंगाबाद ७), लातूर-१ (बीड १), अकोला -३ (अकोला २, अमरावती १), नागपूर-१ (गडचिरोली १).

बुधवारी नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ९४ पुरुष तर ५५ महिला आहेत. काल नोंद झालेल्या १४९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ८७ रुग्ण आहेत तर ४९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १३ जण ४० वर्षांखालील आहे. या १४९ रुग्णांपैकी १०४ जणांमध्ये (७० टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३४३८ झाली आहे.

कालच्या नोंदीपैकी एकूण मृत्यूपैकी ६६ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू  १८ एप्रिल ते ६ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ८३ मृत्यूंपैकी मुंबई ५८, ठाणे-९, नवी मुंबई - ५, जळगाव- ४,उल्हासनगर-३, वसई विरार - २,अमरावती - १ आणि गडचिरोली १ असे आहेत.