मध्य रेल्वेवरील खारकोपर - उरण कॉरिडोअरच्या कामाला वेग

खारकोपर - उरण दरम्यान ५ स्टेशन, २ मोठे पूल, ४१ छोटे पूल, २ रोड अंडर ब्रिज आणि ४ रोड ओव्हर ब्रिज असतील

Updated: Aug 16, 2020, 09:08 PM IST
मध्य रेल्वेवरील खारकोपर - उरण कॉरिडोअरच्या कामाला वेग title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई: लॉकडाऊन व अनलॉक कालावधी दरम्यान मध्य रेल्वेने अनेक पायाभूत सुविधा पूर्ण अथवा त्यांचे बांधकाम वेगाने सुरु आहे. या प्रमुख वेगवान पायाभूत कामांमध्ये  27 कि.मी. लांबीच्या बेलापूर-सीवूड्स - उरण प्रकल्पातील उर्वरित 14.60 कि.मी. खारकोपर -उरण मार्गाचा समावेश आहे. हे मार्ग पूर्ण झाल्यावर मुंबई - उरणमधील अंतर जवळपास ४० टक्के ते ५० टक्के कमी होईल. मध्य रेल्वेच्या निर्माण विभागाने या प्रकल्पाच्या कामाची गती वाढविल्यामुळे रेल्वेला मुंबई ते जवाहरलाल नेहरू बंदरासाठी  हा महत्त्वपूर्ण प्रवेशयोग्य रेल्वेमार्गही पूर्ण करता येईल.खारकोपर - उरण नवीन मार्ग बांधण्याचे काम विविध ठिकाणी सुरु असून पाइल बोरिंग मशीन्स, काँक्रीट प्लेसर बूम्स , ट्रान्झिट मिक्सर्स , ट्रिपर्स, जेसीबी, हायड्रस, पोकलेन्स, हायड्रॉलिक जॅक्स इत्यादींच्या  सहाय्याने प्रगतीपथावर आहे.  

प्रगतीपथावर असलेले महत्वपूर्ण बांधकाम उपक्रम  पुढीलप्रमाणे: 
* रांजनपाडा स्टेशनवरील कव्हर ओव्हर प्लॅटफॉर्मचे सुपरस्ट्रक्चरचे काम 
* न्हावा-शेवा, द्रोणागिरी व उरण स्थानकांवर फाउंडेशन व सब -स्ट्रक्चरचे काम 
* उरण येथील सब-वेचे  काम 
* चैनेज १०९७५ येथे पूलाच्या  फाउंडेशनचे काम 
* स्ट्रेसिंग आणि  यू-गर्डर खाली करण्याचे पूल  ७९८२  येथील काम. 

खारकोपर - उरण दरम्यान ५ स्टेशन, २ मोठे पूल, ४१ छोटे पूल, २ रोड अंडर ब्रिज आणि ४ रोड ओव्हर ब्रिज असतील.  उपलब्ध कामगारांची सुरक्षा आणि आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी सर्व खबरदारी घेण्यात आली  आहे.  लॉकडाउन / अनलॉक कालावधी दरम्यान राबविण्यात आलेली कामे आणि पावसाळ्यातील पावसाच्या विश्रांती दरम्यान उपलब्ध कालावधी, लॉकडाऊनमधील बांधकाम कामकाजासाठी झालेल्या वेळेचा  अपव्यय निश्चितपणे भरून काढणे शक्य होईल.   चेनॅज ८ कि.मी. ते चैनज ११ कि.मी. दरम्यान ४.४७९ हेक्टर जमीनीची व्यवस्था (बहुतेक वनजमिनी) सिडकोकडून  अद्याप मिळणे  बाकी आहे. मध्य रेल्वे मुंबई उपनगरी नेटवर्कचा चौथा कॉरिडोर असलेला बेलापूर - सीवूड्स - उरण रेल्वे मार्ग, पूर्ण झाल्यामुळे मुंबई ते जेएनपीटी व उरण या प्रवाशांच्या प्रवासाची वेळ कमी होईल. तसेच नवी मुंबईत तयार होत असलेल्या विमानतळावर जाण्याची सोयही प्रवाशांना होईल.