हिंगणघाट जळीतकांडावर रेणुका शहाणेंची संतप्त प्रतिक्रिया

समाजातील पुरुषी मानसिकता ही ‘नाही’ म्हणणाऱ्या स्त्रियांना मानतच नाही.

Updated: Feb 10, 2020, 09:28 PM IST
हिंगणघाट जळीतकांडावर रेणुका शहाणेंची संतप्त प्रतिक्रिया title=

मुंबई: वर्ध्याच्या हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीचा सोमवारी मृत्यू झाला. ३ फेब्रुवारीला विकेश नगराळे या नराधमाने या तरुणीला पेट्रोल टाकून जाळले होते. तेव्हापासून या तरुणीची मृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर आज सकाळी तिची प्राणज्योत मालवली. दरोडा या तिच्या मूळगावी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

या सगळ्यानंतर समाजाच्या सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीदेखील साऱ्या प्रकाराविषयी संताप व्यक्त केला. अशाप्रकारच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. कितीही कठोर कायदा केला तर त्याचा काही फरक पडताना दिसत नाही.

हिंगणघाट जळीतकांड पीडितेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

समाजातील पुरुषी मानसिकता ही ‘नाही’ म्हणणाऱ्या स्त्रियांना मानतच नाही. या घटनांना आळा कसा घालायचा हेही कळेनासं झालं आहे. कारण छोट्या घटनांची जेव्हा तक्रार केली जाते तेव्हा महिलांची गंभीरपणे दखल घेतली जात नाही. एखादा मुलगा माझा पाठलाग करतोय अशी तक्रार जर महिलेने पोलिसांकडे केली तर त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही, अशी खंत रेणुका शहाणे यांनी व्यक्त केली. 

हे प्रकार रोखण्यासाठी शाळा-कॉलेजमध्ये लैंगिक शिक्षणासोबत मुलींकडे बघण्याचा मुलांचा दृष्टीकोन कसा असायला पाहिजे हेसुद्धा शिकवायला पाहिजे. मुलीचा होकार म्हणजे काय आणि तो किती महत्त्वाचा आहे याबद्दल चर्चा झाली पाहिजे, असे रेणुका शहाणे यांनी सांगितले. 

मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने आई-वडील आणि भावाची आत्महत्या