राज्यात कोरोना, स्वाईन फ्लू मागोमाग आणखी एक संकट, घेतले 'इतके' बळी

जळगाव, अकोला, अहमदनगर, पुणे जिल्ह्यात 'या' विषाणूचा कहर वाढला  

Updated: Sep 4, 2022, 08:34 AM IST
राज्यात कोरोना, स्वाईन फ्लू मागोमाग आणखी एक संकट, घेतले 'इतके' बळी title=

मुंबई : राज्यात कोरोना (coronavirus) आणि स्वाईन फ्लू नंतर आणखी एक संकट डोकवर काढत आहे. राज्यात लम्पी विषाणूजन्य आजाराचा विळखा वाढला आहे. राज्यात लम्पी (Lumpy Skin Disease) विषाणूमुळे 11 गायींचा मृत्यू झाला आहे. 9 राज्यात आतापर्यंत सुमारे 50 हजार गायींचा बळी गेला आहे. जळगाव, अकोला, अहमदनगर, पुणे जिल्ह्यात लम्पींचा कहर वाढला आहे. त्यामुळे सतर्क राहण्याचा इशारा सरकारकडून देण्यात आला आहे. दुभत्या जनावरांमध्येही हा विषाणू वेगाने पसरत असल्याबद्दल लोकांमध्ये चिंता वाढत आहे. (Lumpy Skin in Maharashtra)

लम्पी विषाणू मानवांमध्ये देखील पसरू शकतो का याबाबत लोकांमध्ये चिंता आहे. कारण दूध हे राजस्थानात सर्वात जास्त वापरले जाणारे पेय आहे. लोकसभेतही हे प्रकरण गाजले. राजस्थानकडून मदतीचा प्रस्ताव आला नसल्याचे केंद्राने म्हटले आहे. ( Lumpy Virus)

मानवांमध्ये पसरत नाही : डॉ राजोरिया
पॉलीक्लिनिकचे संचालक डॉ. जितेंद्र राजोरिया आणि एसएमएस हॉस्पिटलचे वरिष्ठ डॉक्टर डॉ. रमण शर्मा यांनी सांगितले की, लम्पी हा विषाणूजन्य आजार आहे, जो डास आणि कीटक चावल्यामुळे, संक्रमित जनावरांच्या संपर्कामुळे होतो. 

Lumpy Virus | विचित्र आजारामुळे दुभत्या जनावरांवर संकट; दूध प्यावे की नाही तज्ज्ञांनी दिला 'हा' सल्ला

यामुळे दुभत्या जनावरांचे दूध झपाट्याने कमी होते किंवा ते दूध (Milk) देणे बंद करतात. अशा प्राण्याच्या संपर्कात आल्याने त्याचा संसर्ग मानवांमध्ये पसरत नाही.

दूध उकळून प्या (Boil milk and drink it)
डॉ. राजोरिया म्हणाले की, संसर्ग झालेल्या जनावराच्या दुधात विषाणू आढळून आल्याची कोणतीही माहिती अद्याप झालेली नाही. परंतू खबरदारीचा उपाय म्हणून दूध उकळूनच प्यावे.

डॉ. रमण शर्मा यांनी सांगितले की, मानवामध्ये लम्पीसारखा ( Lumpy Virus) कोणताही विषाणू नाही. मानवांमध्ये त्याचा प्रसार झाल्याची अशी कोणतीही घटना घडलेली नाही.