विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर राज्य सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय

विनायक मेटे यांच्या निधनानंतर मंत्रिमंडळात देखील या प्रकरणावर चर्चा झाली. मंत्र्यांनी यावेळी सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केलाय.

Updated: Aug 16, 2022, 07:58 PM IST
विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर राज्य सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय title=

मुंबई : माजी आमदार आणि शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाने पुन्हा एकदा महाराष्ट्राने चांगला नेता गमवला. विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात झाल्यानंतर त्यांना लवकर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. गाडीच्या चालकाने ही लवकर मदत न मिळाल्याचं म्हटलं होतं. आता या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

या प्रकरणावर मंत्री मंडळात देखील चर्चा झाली. राज्य सरकार लवकर या घटनेनंतर महत्त्वाचा निर्णय जाहीर करणार आहे. एक्सप्रेस वे वर एअर एम्ब्युलन्सची सुविधा लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे यंत्रणेची चौकशी केली जाणार आहे.

हायवेवर सीसीटिव्ही कॅमेरा मॅानिटरिंग नव्हती का? accident alert यंत्रणा काय करत होती? विनायक मेटेंना तात्काळ मदत का मिळाली नाही? मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे यंत्रणेवरील क्युक रिसपॅान्स टीम काय करत होती? असे प्रश्न मंत्रिमंडळात उपस्थित करण्यात आले. 

आमदारांना सतत प्रवास करावा लागतो. यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त असते. प्रवासादरम्यान आमदारांच्या सुरक्षितते बाबत सरकारने विचार करण्याची मागणी यावेळी मंत्र्यांनी केली आहे.