भाजपा विरोधात उद्यापासून जन-आक्रोश रॅली

 राज्यातील भाजप सरकारला ३ वर्षे पूर्ण होत असताना या काळातील सरकारचे अपयश सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवण्याकरता काँग्रेसतर्फे जन-आक्रोश रॅलीचं आयोजन करण्यात आले आहे. 

Updated: Oct 30, 2017, 10:43 AM IST
भाजपा विरोधात उद्यापासून जन-आक्रोश रॅली title=

मुंबई : राज्यातील भाजप सरकारला ३ वर्षे पूर्ण होत असताना या काळातील सरकारचे अपयश सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवण्याकरता काँग्रेसतर्फे जन-आक्रोश रॅलीचं आयोजन करण्यात आले आहे. 

उद्या मंगळवार, ३१ ऑक्टोबरला नगर जिल्ह्यातून या रॅलीला सुरूवात होणार आहे. राज्यातील ६ शहरात रॅली निघणार असून विदर्भात चंद्रपूर आणि अमरावती येथे याचं आयोजन होणार असल्याचं माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांनी नागपूर येथे सांगितले. 

 दूसरीकडे राज्य सरकार कर्जबाजारी होण्याच्या उंबरठ्यावर असून कर्मचाऱ्यांचे पगार देण्याकरता ओव्हर ड्राफ्ट काढण्याची वेळ राज्य सरकारवर येणार असल्याची टीका देखील काँग्रेस नेत्यांनी केली.