हिंगणेदेह येथे कुऱ्हाडीने तिघांची हत्या

 नांदगाव तालुक्यातल्या हिंगणेदेहरमध्ये आज पहाटे तिघांची हत्या करण्यात आली. पहाटे तीनच्या सुमाराला त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ४ ते ५ जण जखमी झालेत. 

Updated: Sep 12, 2017, 04:53 PM IST
हिंगणेदेह येथे कुऱ्हाडीने तिघांची हत्या  title=

मडगाव : नांदगाव तालुक्यातल्या हिंगणेदेहरमध्ये आज पहाटे तिघांची हत्या करण्यात आली. पहाटे तीनच्या सुमाराला त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ४ ते ५ जण जखमी झालेत. 

याप्रकरणी नांदगाव पोलिसांनी रवींद्र पोपट बागुल या संशयीताला ताब्यात घेतले आहे. त्यानेच हत्या केल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान या प्रकरणातल्या मृतांची केशव कचरु बागुल, सुभाष बच्छाव आणि विक्रम मांगू पवार अशी नावे आहेत. 

या घटनेनंतर ग्रामस्थानी संशयित आरोपीला पकड़ून पोलिसांच्या ताब्यात दिलं. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालीय. रवींद्र बागुल हा तरुण मानसिक आजाराने ग्रासलेला होता. अचनाक तो हातात कुऱ्हाड घेऊन निघाला. आणि रस्त्यात जो दिसेल त्याच्यावर तो धावून जात होता. याबाबत त्याचे आजोबा विचारपूस करायला गेले असता. त्याने त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. 

त्यानंतर रवींद्र गावाच्या दिशेने सुसाट धावत सुटला. याचवेळी न्यायडोंगरीमधून दुचाकीवर येणाऱ्या सुभाष भीमाजी बच्छाव यांच्यावर वार केला. यानंतर विक्रम पवारांवर त्यांनी हल्ला चढवला. या घटनेत तिघेही जागीच ठार झाले.