टीईटी परीक्षा : ठाणे, धुळ्यानंतर रत्नागिरीतही परीक्षा केंद्रावर गोंधळ

रत्नागिरीत रा.भा. शिर्के  प्रशाला टीईटी परीक्षा (TET)केंद्रामध्ये केवळ दहा विद्यार्थीनीना परीक्षा प्रवेश पत्रावरील नाव वेगळे असल्याने परीक्षा समन्वयकांनी परीक्षार्थीना रोखले. त्यामुळे या केंद्रावर काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. 

Updated: Jul 22, 2017, 08:09 PM IST
टीईटी परीक्षा : ठाणे, धुळ्यानंतर रत्नागिरीतही परीक्षा केंद्रावर गोंधळ title=
संग्रहित छाया

रत्नागिरी : शहरातील रा.भा. शिर्के  प्रशाला टीईटी परीक्षा (TET)केंद्रामध्ये केवळ दहा विद्यार्थीनीना परीक्षा प्रवेश पत्रावरील नाव वेगळे असल्याने परीक्षा समन्वयकांनी परीक्षार्थीना रोखले. त्यामुळे या केंद्रावर काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. 

तसेच पोलिसांनी समन्वयकांकडे त्यांचे मत मांडायला मज्जाव केल्याने, शिक्षकी पेशाची पदविका पास असताना देखील. केवळ नावाच्या बदलामुळे विद्यार्थीनीना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे एक वर्ष वाया जाणार आहे.

काही विद्यार्थ्याना वेळेचा देखील फटका बसला असून परीक्षा केंद्रावर विनंती करून देखील या विद्यार्थ्याना परीक्षेला बसू दिलं गेलं नाही. त्यामुळे यांचं परीक्षेला पात्र असून देखील परीक्षा देता आली नाही. 

दरम्यान, पावसामुळे 'महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा' अर्थात 'महा टीईटी'च्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर उशीरा पोहचलेल्या परीक्षार्थींना परीक्षेला मुकावं लागलंय. 

ठाण्यात पाचपाखाडी परीसरातील सरस्वती एज्युकेशन सोसासटीमध्ये हा प्रकार घडला. शनिवारी 'टीईटी' परीक्षेसाठी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत वेळ देण्यात आली होती. या परीक्षेसाठी परीक्षार्थी ठाणे, मुंबई, टीटवाळा अशा अनेक ठिकाणांहून परीक्षेच्या ठिकाणी दाखल झाले होते. परंतु, 'आपल्याला पोहचण्यास दहा मिनिटे उशीर झाला.

तर धुळ्यामध्येही अशी परिस्थिती पाहायला मिळाली. टीईटी  च्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर येण्यास उशीर झालेल्या परीक्षार्थींनाही प्रवेश नाकारला गेला. विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न दिल्याने शहरातील चार परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थी आणि पालकांचे आंदोलन केले.