राज्य अर्थसंकल्प २०१८ : शेतकऱ्यांसाठी काय ?

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आज विधानसभेत 2018-19 या अर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करत आहेत.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Mar 9, 2018, 02:53 PM IST
 राज्य अर्थसंकल्प २०१८ : शेतकऱ्यांसाठी काय ? title=

मुंबई : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आज विधानसभेत 2018-19 या अर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करत आहेत.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवण्याच्या दृष्टीने तरतूदी करण्यात आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे..

- शाश्वत शेतीसाठी पाणी गरजेचे, म्हणून मागेल त्याला शेततळी, जलयुक्त शिवार, विहरी कार्यक्रा हाती घेतला

- ३११५ कोटी रुपयांची तरतुद पंतप्रधान सिंचन योजेनेसाठी, २६ प्रकल्प
- ८२३३ कोटी रुपयांची तरतुद जलसंपदा विभागासाठी

- पाटबंधाऱ्याचे ५० प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दीष्ट

- जलयुक्त शिवार योजनेसाठी १५०० कोटी

- वनशेतीस प्रोत्साहन देण्यासाठी १५ कोटी

- सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी १०० कोटी

- रोहयो अंतर्गत आंबा, काजूच्या फळबागांसाठी १०० कोटी रुपये

- कांदा प्रक्रियेसाठी ५० कोटी

- कर्जमाफी अंतर्गत आतापर्यंत ३५.६८ लाख १३६०० कोटी रुपयांचे वितरण

- ९३ हजार कृषीपंपांना विद्युत जोडणी देण्यासाठी ७५० कोटींची तरतुद

- एसटी महामंडळाकडून शेतमाल वाहतुक सुरू करण्याची योजना 

- बसस्थानकांच्या पुनर्बांधणी व विकासासाठी ४० कोटी

- रेशीम विकास ३ कोटी