'रामाच्या नावानं किती वर्ष राजकारण करणार ?'

 नवरात्रीत रामलीला करण्यास भाजपने मागितली परवानगी 

Updated: Oct 16, 2020, 12:29 PM IST
'रामाच्या नावानं किती वर्ष राजकारण करणार ?' title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : रामाच्या नावानं किती वर्ष राजकारण करणार ? असा प्रश्न शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांना केलाय. कोरोना काळात नवरात्रीत रामलीलाला परवानगी द्या अशी मागणी भाजपचे अतुल भातखळकर यांनी केलीय. या पार्श्वभुमीवर सरनाईक यांनी भातखळकरांना टोला लगावलाय. 

पंतप्रधानांनी देखील कोरोना संपला नसल्याचं सांगत काळजी घेण्याचं आवाहन केलंय. कोरोना अजून संपला नाही हे भातखळकरांना माहित नाही हे दुर्देव असल्याचेही सरनाईक म्हणाले. 

आजपर्यंत मुंबईत महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेनेच रामलीलाला परवानगी दिली आहे. गेले अनेक वर्ष तुम्ही रामाच्या नावानेच मतं मागत आहात. रामाच्या नावाने किती वर्ष राजकारण करणार ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हळूहळू सर्व गोष्टी सुरू करतायत. मॉल, मेट्रो चालू करतायत. सिनेमागृह काही दिवसात सुरू करतील तसेच मंदिरं आणि धार्मिक स्थळंही खुली करतील. महाराष्ट्र कोरोनाचे असंख्य बळी गेलेले आहेत आणि मंदिरं खुली करा अशी तुम्ही मागणी विरोधक करतायत असा टोला त्यांनी लगावलाय.

फक्त राजकारण करण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांवर आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधण्यासाठी अशा प्रकारे धर्माच्या नावाखाली मागणी करत असाल तर ते चुकीचे आहे. अतुलजी तुम्हाला ही जनता कधीही माफ करणार नाही असेही सरनाईक म्हणाले.