राज्यातील संवेदनशील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर 'या' शहरात जमावबंदी लागू; पोलिसांकडून खबरदारीचे आदेश

राज्यातील संवेदनशील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर  नाशिकमध्ये 28 जून मध्यरात्री पासून ते 12 जुलै पर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. 

Updated: Jun 27, 2022, 12:28 PM IST
राज्यातील संवेदनशील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर 'या' शहरात जमावबंदी लागू; पोलिसांकडून खबरदारीचे आदेश title=

नाशिक : राज्यातील संवेदनशील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर  नाशिकमध्ये 28 जून मध्यरात्री पासून ते 12 जुलै पर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. 

 शिवसेना पक्षातील सदस्यांची बंडखोरी, अग्निपथ सैन्य भरती प्रक्रियेवरून आंदोलने आणि निदर्शने, भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनीं मुस्लिम धर्मगुरू यांच्याबाबत केलेले आक्षेपार्ह वादग्रस्त वक्तव्य आणि आगामी सण या सर्व पार्श्वभूमीवर शहरात 15 दिवसाची जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी नाशिक शहर पोलीसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे.