अंबरनाथ रेल्वे स्टेशनवर टोळक्याकडून पोलिसावर जीवघेणा हल्ला

येथील  स्टेशनवर आपली सेवा बजावत असताना रेल्वे पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. हा हल्ला ७ ते ८ जणांच्या टोळीने केलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 27, 2017, 07:09 PM IST
अंबरनाथ रेल्वे स्टेशनवर टोळक्याकडून पोलिसावर जीवघेणा हल्ला title=

अंबरनाथ : येथील  स्टेशनवर आपली सेवा बजावत असताना रेल्वे पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. हा हल्ला ७ ते ८ जणांच्या टोळीने केलाय.

अंबरनाथ रेल्वे स्टेशनवर मध्यरात्री दीड वाजल्याच्या सुमारास सुधीर कांबळे हे रे गस्त घालून रेल्वे च्या हद्दीत असलेल्या रेस्ट रूम वर गेले. त्याठिकाणी काही तरुणांची टोळी  उभी होती. त्यांना कांबळे यांनी हटकले असता या टोळक्याने कांबळे यांच्यावर हल्ला केला.

या हल्ल्यात कांबळे जखमी झालेत. त्यांना अन्य सहकाऱ्यांनी  कल्याणच्या रेल्वे रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या प्रकरणी रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हल्लेखोरांचा रेल्वे पोलिसांकडून शोध सुरु आहे.