मराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घेणार? जरांगेंच्या मागणीवर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'सरकार..'

Maratha Reservation: मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे.

Pravin Dabholkar | Updated: Mar 18, 2024, 07:36 PM IST
मराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घेणार? जरांगेंच्या मागणीवर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'सरकार..' title=
CM Eknath Shinde On Maratha Protestor

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मराठ्यांना कुणबीतून आरक्षण, सगेसोयरे कायदा असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. दरम्यान अनेक दिवसांपासून शांततेत चाललेल्या मराठा मोर्चाला काही दिवासंपुर्वी हिंसेचे गालबोट लागले होते.  यावेळी मराठा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे सरसकट मागे घ्यावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली होती. यावर आंदोलनाचे गुन्हे मागे घेतले जातील पण गंभीर स्वरुपाचे गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गुन्हे मागे घेण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. मराठा आंदोलक यांचे दाखल गुन्हे मागे घेतले जाणार अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 

24 तारखेला अंतिम बैठक

राजकारण माझा मार्ग नाही मी निवडणूक लढणार नाही चळवळीतून न्याय देणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. 24 तारखे मराठा समाजाची अंतिम आणि ठोस बैठक असेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. सरकारला पश्चातापाची वेळ आणली नाही तर नाव बदलून ठेवीन, असे ते म्हणाले. अंमलबजावणी करणं परवडलं असतं असा विचार सरकार करेल असेही त्यांनी सांगितले. सरकारने आमची वारंवार फसवणूक केली आज देतो उद्या देतो म्हणून आमची फसवणूक केल्याचे ते म्हणाले. 

ऑन निवडणूक लढणार का?

मनोज जरांगेनी निवडणूक लढावी असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. याला मनोज जरांगेंनी उत्तर दिलंय. प्रकाश आंबेडकर यांच्या शब्दाचा मी सन्मान करतो. ते नेहमी जे बोलतात ते स्पष्ट बोलतात मात्र राजकारण माझा मार्ग नाही. सामाजिक चळवळीतून न्याय मिळवणे हाच माझा मार्ग आहे. सामाजिक चळवळीतून सत्तेत आणि राजकारणात नसताना ज्या गोष्टी मिळणार नाही त्या मिळाल्या,असे त्यांनी सांगितले. 

24 तारखेला आम्ही राज्यातील मराठा समाजाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आम्ही आमची पुढची दिशा ठरवणार आहे. या बैठकीला सर्व तज्ञ हजर राहणार आहेत. समाजाकडून दोन दिवस तिथे जेवणाची सुद्धा व्यवस्था केली आहे. जी प्रचंड मोठी बैठक असणार आणि निर्णायक बैठक असणार आहे. आचारसंहिता लागण्याच्या अगोदर निर्णय घेणार होते मात्र घेतला नाही. 24 तारखेला अंतिम बैठक आणि अंतिम निर्णय मराठा समाजाचा असणार आहे. एक मताने ठोस निर्णय घ्यायचा आहे. 

सरकारला कायद्याने खेटणार 

सरकार कायद्याने खेटत असेल तर आम्ही देखील आता सरकारला कायद्याने खेटणार आहोत आणि यावर 24 तारखेला निर्णय होईल. 900 एकर मध्ये आमची सभा होणार आहे ती कुठे घ्यायची त्याचाही निर्णय या बैठकीत घेऊ. ठोस निर्णय झाल्याच्या नंतर सरकारला कळणार आहे की आपण सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी केली असती तर बरं झालं असतं आता उलटाच कुटाणा झाला तुम्हाला नाही पश्चाताप करायला लावला तर नाव बदलून ठेवीन, असे ते म्हणाले.