महाशिवरात्रीला कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील अनेक तीर्थस्थानं बंद

महाशिवरात्रीच्या दिवशी राज्यातील अनेक मंदिरं राहणार बंद

Updated: Mar 9, 2021, 07:49 PM IST
महाशिवरात्रीला कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील अनेक तीर्थस्थानं बंद title=

मुंबई : महाशिवरात्रीच्या निमित्ताने राज्यात विविध शिवमंदिरांमध्ये दर्शनसाठी भाविक येत असतात. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय़ घेतला गेला आहे. स्थानिक पातळीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील अनेक महत्त्वाची मंदिरे महाशिवरात्रीला बंद ठेवण्यात येणार आहेत.

जेजुरी गड

निमित्त जेजुरी गडावर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही गर्दी टाळण्यासाठी उद्या 10 आणि 12 तारखेपर्यंत 144 कलम लागू करण्यात आला आहे. जमाबंदीचा कायदा तोडल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच खंडेरायाच्या मंदिरावर पाताळ लोक पृथ्वी व अवकाशातील लिंगाचे दर्शनसाठी खंडोबा मंदिरावर सक्त बंदी करण्यात आली आहे. तसेच जेजुरी बाहेरील येणार्यांना देखील बंदी करण्यात आली आहे. हॉटेल लॉज यांना देखील मुक्कामी बुकिंग न देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सोनेश्वर मंदिर 

महाशिवरात्रीला बारामती तालुक्यातील सोनेश्वर मंदिरे बंद राहणार आहे. बारामती प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. कोविड १९ विषाणुचा प्रादुर्भाव रोखणेसाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या अनुषंगाने बारामती तालुक्यातील  कऱ्हा निरा नदीच्या संगमावर असलेल्या सोनगांव येथील सोनेश्वर मंदिर हे ब वर्ग दर्जाचे तिर्थक्षेत्र महाशिवरात्र निमित्त बंद राहणार आहे.

इतर शिवमंदिरं ही बंद

येथे दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो भाविक येण्याची शक्यता असल्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार गर्दीमुळे वाढू नये या दृष्टीने मंदिरं महाशिवरात्री निमित्त बंद राहणार असल्याचा आदेश पत्रकाच्या माध्यमातून बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांनी काढला आहे. यामुळे भाविकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात येऊ नये असे आव्हान देवस्थान आणि प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

श्री क्षेत्र महाबळेश्वर

सातारा जिल्ह्यतील महाबळेश्वर येथील श्री क्षेत्र महाबळेश्वर आणि जिल्ह्यातील इतर महादेवाची देवस्थानं 3 दिवस बंद राहणार आहेत. ११ तारखेला महाशिवरात्री असल्याने दिनांक १० ,११ आणि १२ हे तीन दिवस महादेवाची मंदिरे बंद राहणार आहेत. महाशिवरात्रीला श्री क्षेत्र महाबळेश्वर आणि शिखर शिंगणापूर या महादेवाच्या मंदिरात मोठ्या संख्येने राज्यभरातून भाविक येत असतात. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने महादेवाची मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.