...तर दानवेंचा लंगोटही शिल्लक राहणार नाही- आ. बच्चू कडू

 शेतकऱ्यांना 'साले' अशी शिवी देणाऱ्या दानवेंविरोधात जालन्यातून निवडणूक लढण्याची घोषणा त्यांनी केलीये.

Updated: Oct 14, 2018, 08:19 PM IST
...तर दानवेंचा लंगोटही शिल्लक राहणार नाही- आ. बच्चू कडू  title=

जालना : भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंवर टीका करताना प्रहार संघटनेचे नेते आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा तोल घसरलाय...दानवे आपल्या मतदारसंघात येऊन निवडणूक लढले, तर त्यांचा लंगोटही शिल्लक राहणार नाही, असं कडू म्हणालेत.

एकाच शब्दावर निवडणूक 

 शेतकऱ्यांना 'साले' अशी शिवी देणाऱ्या दानवेंविरोधात जालन्यातून निवडणूक लढण्याची घोषणा त्यांनी केलीये.

त्यानंतर ते आज जालन्यात आले होते. दानवेंनी शेतकऱ्यांसाठी वापरलेल्या या एकाच शब्दावर निवडणूक लढणार असल्याची घोषणा कडू यांनी यावेळी केली.