तीन महिन्यांपासून बेपत्ता असलेला अक्षय अखेर घरी परतला, पण...

गेल्या तीन महिन्यांपासून अचानक बेपत्ता झालेला बदलापूरचा अक्षय कांबळे हा विद्यार्थी घरी परतलाय.

Updated: Mar 3, 2018, 03:48 PM IST
तीन महिन्यांपासून बेपत्ता असलेला अक्षय अखेर घरी परतला, पण...  title=

बदलापूर : गेल्या तीन महिन्यांपासून अचानक बेपत्ता झालेला बदलापूरचा अक्षय कांबळे हा विद्यार्थी घरी परतलाय.

कुठे होता अक्षय?

अक्षय कानपूर आयआयटीमध्ये तृतीय वर्षात शिकतोय. परीक्षेनंतर सुट्टी असल्याने २९ नोव्हेंबरला अक्षय कानपूरहून बदलापूरला येण्यासाठी निघाला होता. मात्र, तो घरी काही पोहचलाच नाही. बेपत्ता अक्षयचा शोध घेण्यासाठी त्याचे वडील गेल्या तीन महिन्यांपासून कानपूरमध्येच होते. अखेर तीन महिन्यांनंतर अक्षय शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास बदलापूरच्या घरी परतलाय.

मानसिक धक्का

मात्र, अक्षयला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. तो कुठे होता? काय करत होता? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून अक्षय कुठे होता हा प्रश्न अनुत्तरितच आहे. अक्षयच्या वडिलांनीही या सगळ्याबाबत बोलण्यास नकार दिलाय. 

काय होतं प्रकरण  

मुलगा बेपत्ता झाल्यानंतर अक्षयला त्याचे काही सहकारी त्रास देत असल्याचीही माहिती अक्षयच्या वडिलांनी पोलिसांना दिली होती. पोलीस चौकशीत अक्षयच्या एका मित्राकडे त्याचा स्मार्ट फोन आणि हॉस्टेलच्या सफाई कामगारांकडे त्याचे दोन सिम कार्ड, तर दुसऱ्या सफाई कामगाराकडे त्याचे एटीएम आणि आयकार्ड सापडलं होतं... त्यामुळे या प्रकरणाचं गूढ आणखीन वाढलं होतं.