'या' दोन सख्या बहिणींवर एकाचं मुलासोबत विवाह करण्याची का आली वेळ?

काय आहे या विवाहामागचं सत्य?  

Updated: Jun 22, 2021, 12:58 PM IST
'या' दोन सख्या बहिणींवर एकाचं मुलासोबत विवाह करण्याची का आली वेळ?  title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर विचित्र आणि मजेशीर विवाह समोर येत आहेत. आता देखील एक असाचं प्रकार समोर येत आहे. तेलंगनामध्ये देखील असचं एक विवाह संपन्न झाला आहे. एका व्यक्तीने एकाचं मंडपात दोन सख्या बहिणींसोबत लग्न केलं आहे. इंडिया टुडेनुसार, 14 जून रोजी झालेल्या विवाहात तेलंगनातील घनपूर गावच्या अर्जूनने त्याच्या नातेवाईकांच्या दोन मुलींसोबत लग्न केलं आहे. सांगायचं झालं तर अर्जूनला दोन बहिणींपैकी मोठी बहिणी उषासोबत प्रेम झालं. त्यानंतर त्याचा जीव छोटी मुलगी सुरेखावर जडला. 

अनेक वर्ष त्याचं प्रेम प्रकरण दोघी बहिणींसोबत सुरू होतं. पण जेव्हा अर्जुनच्या घरी त्याच्या लग्नचा विषय निघाला, तेव्हा हे सत्य उघडकीस आलं. त्यानंतर अर्जुनने त्यांच्या आई-वडिलांना मी उषा आणि सुरेखा दोघांवर प्रेम करतो, मला दोघींसोबत लग्न करायचं आहे. अर्जुनने दोघी बहिणींच्या  आई-वडिलांना लग्नासाठी राजी केलं. त्यानंतर उषा आणि सुरेखाच्या संमतीने लग्न केले.

या अनोख्या लग्नात मुलगा आणि मुलींचे नातेवाईक उपस्थित होते. सध्या या लग्नाचे सर्वत्र चर्चा होत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका मुलासोबत दोन सख्या बहिणींचा विवाह लग्न कल्पनेच्या बाहेर आहे.