Kalahandi News: पैसे, नोकरी नाही म्हणून तीन मजूरांनी केला 1000 किलोमीटरचा पायी प्रवास... वाचून अंगावर येईल शहारा

Villagers Travels 1000 KM Kalahandi: गरीबांचे शोषण हे काही केल्या कमी (Poor citizens) होत नाही, असेच दिसते आहे. त्यातून सध्या अशीच बातमी समोर येते आहे. ज्यात तीन गरीब मजूरांना नोकरीचे (Villagers Walks 1000 KM) पैसे मिळत नाहीत म्हणून आपली बंगलोरची नोकरी सोडावी लागली आणि ओडिसाला 1000 किलोमीटर पायी (Kalahandi News) आपल्या घरी चालत यावे लागले. 

Updated: Apr 5, 2023, 06:36 PM IST
Kalahandi News: पैसे, नोकरी नाही म्हणून तीन मजूरांनी केला 1000 किलोमीटरचा पायी प्रवास... वाचून अंगावर येईल शहारा  title=
Photo - PTI / Twitter

Villagers Travels 1000 KM walking from Banglore to Odisha: आजही देशात अनेक गरीब मजूर आहेत ज्यांना नोकरी अभावी मिळेल (Unorgnized Labour) ते काम करावे लागते आहे. परंतु हातात पैसे नसतील तर आयुष्यात काहीच करता येत नाही. अशाच तीन गरीब मजूरांची कहाणी वाचून तुमच्याही काळजाचे पाणी (Villagers walks 1000 Km) झाल्याशिवाय राहणार नाही. हातात पैसे नव्हते म्हणून तीन मजूरांना 1000 किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागला आहे. ही बातमी वाचून कोरोनाच्या काळात घर गाठण्यासाठी निघालेल्या अन् हजारो किलोमीटरचा प्रवास पायी करणाऱ्या त्या गरीब मजूरांची आठवण आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. परंतु नक्की या तिघांना असं पायी का बरं चालत जावे लागले असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. (Three villagers have to travel by walking 1000 kilometre in 7 days from bengalore to kalahandi as they dont get job in banglore lacking with money)

खिशात पैसे नाहीत परंतु नोकरी मिळेल या आशेत त्या तिघांनी नोकरी शोधण्यासाठी घर सोडलं परंतु त्यातून काहीच साध्य झालं नाही म्हणून ते माघारी परत आले. 26 मार्च रोजी कटार, बुडू आणि भिकारी नावाच्या या तीन मजूरांनी आपला प्रवास सुरू केला. बंगलोर ते ओडिसा (Bangalore) असा प्रवास त्यांनी केला. त्यांनी विशाखापट्टणम (Vishakapattanam) गाठले मग तिथून ते आंध्र प्रदेशातील विझियानगरम (Vazianagar) येथे पोहोचले.

ओडिसातील कालाहंडी (Kalahandi) जिल्ह्यातील जयपट्टणा ब्लॉकमधून हे तिघंही नोकरीच्या शोधात बंगलोरला निघाले होते. परंतु दुर्देवानं काम न मिळाल्यानं त्यांना परत माघारी यावे लागले तेव्हा त्यांना अक्षरक्ष: पायी प्रवास करावा लागला. इंडियन एक्सप्रेसशी फोनवरून बोलताना त्यांनी सांगितले की, हे तिघं चालतच होते तर मध्येच ते हिचहाइकिंग करायचे. त्यांची ही दुर्दशा आणि विलक्षण अवस्था पाहून अनेक चांगल्या लोकांनी त्यांना वाटेत खायलाही दिले. हे तिघं टिंगुपखान (Tingupkhan) या डोंगरी गावचे रहिवासी आहेत. 

समोर आलेल्या माहितीनुसार, या तिघांनी हा प्रवास करण्यासाठी 7 दिवस लागले. या कंत्राटदाराकडून बांधकाम कामगार म्हणून काम मिळाले परंतु कोरापुटमध्ये पोट्टंगी येथे त्यांचा कोणतरी व्हिडीओ शूट केला गेला असे कळले ज्यातून कळते की त्यांनी एक महिना काम केले परंतु त्यांना त्याचा पगार मिळाला नाही. पैसे मागितल्यावर तेथील ठेकेदारानं त्यांना मारहाणही केले असे कळते. 

सध्या अशा अनेक घटना सगळीकडे घडताना दिसत आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणावर गरीबांचे शोषण होताना दिसत आहे. या प्रसंगामुळे अशा ठिकाणी काम करणाऱ्यांच्या अवस्थेबद्दल खेद व्यक्त करावा तेवढाच कमी आहे. सध्या या बातमीनं सगळीकडेच खळबळ उडाली आहे.