Power Crisis : देशावर ब्लॅक आऊटचं संकट, वीज कपातीच्या काळात वीज मागणीने तोडले सर्व रेकॉर्ड

Power Demand: देशावर ब्लॅक आऊटचं संकट आहे. 81 कोळसा प्लांटमध्ये 5 दिवस पुरेल एवढाच साठा आहे. वाढत्या उष्णतेमुळे विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. देशात 10 हजार 770 मेगावॅट विजेची टंचाई आहे. 

Updated: Apr 30, 2022, 10:03 AM IST
Power Crisis : देशावर ब्लॅक आऊटचं संकट, वीज कपातीच्या काळात वीज मागणीने तोडले सर्व रेकॉर्ड  title=

मुंबई : Power Demand: देशावर ब्लॅक आऊटचं संकट आहे. 81 कोळसा प्लांटमध्ये 5 दिवस पुरेल एवढाच साठा आहे. वाढत्या उष्णतेमुळे विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. देशात 10 हजार 770 मेगावॅट विजेची टंचाई आहे. देशात उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. उष्णतेची लाट आहे आणि ही लाट आणखी तीन दिवस राहण्याचा अंदाज आहे. 

त्यामुळे तापमानात अधिक वाढ होणार आहे. त्यातच या दिवसात कडक उन्हात देशभरातील लोकांना वीजपुरवठा खंडित होण्याचा सामना करावा लागत आहे. 'पीक अवर'मध्ये देशातील विजेची मागणी शुक्रवारी  207,111 मेगावॅटच्या विक्रमी पातळीवर पोहोचली. असे उर्जा मंत्रालयाने म्हटले आहे. मंत्रालयाने ट्विट केले की, 'आज सकाळी 14:50 वाजता, संपूर्ण भारतात कमाल मागणी 207111 MW वर पोहोचली आहे, जी आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे.'

विजेची मागणी  12.1% नी वाढली

यंदा उन्हाळा सुरू झाल्यापासून विजेची मागणी सातत्याने वाढत आहे. मंत्रालयाने सांगितले की, या महिन्यात 28 एप्रिलपर्यंत विजेची मागणी 12.1 टक्क्यांनी वाढून 204.653 GW झाली आहे, जी गेल्या वर्षी या वेळी 182.559 GW होती. गुरुवारी संपूर्ण भारतातील कमाल मागणी 204,653 मेगावॅट होती. दरम्यान, महाराष्ट्रातही कोळसाटंचाईचे संकट गडद होऊन वीजनिर्मिवर परिणाम होत असतानाच, राज्य आणि केंद्र सरकारकडून वेगवेगळी स्थिती मांडली जात आहे. याच पार्श्वभूमीवर एकीकडे राज्यातील महानिर्मिती कंपनीकडे फक्त सरासरी साडेतीन दिवसांचा कोळसा शिल्लक असल्याचे समोर आले आहे.

दिल्लीत एका दिवसापेक्षा कमी साठा

दरम्यान, दिल्लीचे ऊर्जा मंत्री सत्येंद्र जैन यांनी शुक्रवारी सांगितले की, देशभरात कोळशाचे गंभीर संकट असून अनेक वीज प्रकल्पांमध्ये केवळ एक दिवसाचा कोळशाचा साठा शिल्लक आहे. सध्या सुरू असलेल्या कोळशाच्या संकटावर जैन म्हणाले, "(पॉवर) बॅकअप नाही. कोळशाचा बॅकअप 21 दिवसांपेक्षा जास्त असावा, परंतु अनेक पॉवर प्लांटमध्ये एका दिवसापेक्षा कमी साठा शिल्लक आहे."

 ते म्हणाले, "जर वीज निर्मिती होत राहिली आणि ती मिळत राहिली, तर कोणतीही अडचण नाही." मात्र वीज प्रकल्प बंद झाल्यास दिल्लीत मोठी समस्या निर्माण होणार आहे. देशात कोळशाचा तुटवडा आहे.

एनटीपीसीने ही माहिती दिली

तथापि, एनटीपीसीने नंतर एक निवेदन जारी केले, ज्यात असे म्हटले आहे की, "दादरीचे सर्व सहा युनिट्स आणि उंचाहरचे पाच युनिट पूर्ण क्षमतेने चालू आहेत आणि नियमित कोळसा पुरवठा होत आहेत." सध्या हा साठा 140,000 MT आणि 95,000 MT आहे. आयात कोळशाचा पुरवठाही पाइपलाइनमध्ये आहे.

"सध्या, आम्ही उंचाहर आणि दादरी स्टेशन ग्रिड्स 100 टक्के रेट केलेल्या क्षमतेपेक्षा जास्त घोषित करत आहोत," असे निवेदनात म्हटले आहे. उंचाहर युनिट 1 वगळता त्यांचे सर्व युनिट्स पूर्ण भाराने चालू आहेत, जे वार्षिक निश्चित दुरुस्ती अंतर्गत आहे.