भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू, भरधाव ट्रक बनला कर्दनकाळ

बिहारच्या नालंदा जिल्ह्यात भीषण अपघात घडला आहे.

Updated: Mar 29, 2021, 07:59 AM IST
भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू, भरधाव ट्रक बनला कर्दनकाळ title=

नालंदा : बिहारच्या नालंदा जिल्ह्यात भीषण अपघात घडला आहे. एका मिठाईच्या दुकानात घुसलेल्या ट्रकने अनेक लोकांना धडक दिली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात 7 जणांचा जागीच मृत्यू तर 12 पेक्षा जास्त जणांना गंभीर दुखापत झाली आहे.
 
तेल्हाडामधून सर्व मृतदेह शरीफ सदर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. नालंदाचे खासदार कौशलेंद्र कुमार यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे.

मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्या आदेशानुसार मृतांच्या कुटूंबियांना जिल्हाधिकाऱ्यांनी 44 लाखाचा धनादेश सूपुर्द केला आहे.
 
ट्रकच्या धडकेने झालेल्या अपघात आणि 7 जणांच्या मृत्यूमुळे संतप्त जमावाने ट्रकला पेटवले. लोकांना शांत करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवरही दगडफेक करण्यात आली. संतप्त जमावाने तेल्हाडा पोलीस स्टेशनच्या बाहेरील वाहनांनाही पेटवून दिले.
 
या अपघातात गंभीर जखमी असलेल्यांची प्रकृती नाजूक असल्याचे बोलले जात आहे.