...तर काश्मीरमध्ये तिरंगा फडकवणारा कोणीही उरणार नाही'

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३५(ए) मध्ये बदल केल्यास काश्मीरमध्ये तिरंगा फडकवणारा कुणीही उरणार नाही

Updated: Jul 29, 2017, 12:47 PM IST
...तर काश्मीरमध्ये तिरंगा फडकवणारा कोणीही उरणार नाही'  title=

श्रीनगर : भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३५(ए) मध्ये बदल केल्यास काश्मीरमध्ये तिरंगा फडकवणारा कुणीही उरणार नाही अशी धमकी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी दिली आहे. जम्मू काश्मीरच्या विशेष अधिकारावरुन त्यांनी ही धमकी दिली आहे.

काश्मीरमधील जनतेला मिळालेल्या या विशेष अधिकारांवर घाला घालण्याचं काम केलं तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असं मुफ्ती यांनी म्हटलंय. त्यामुळे तिरंग्याचं संरक्षण करणारा आणि तिरंगा फडकावणारा कुणीही उरणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय.