किसान क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट; बँकांकडून मिळणार 'ही' सुविधा

Nirmala Sitharaman on KCC: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी किसान क्रेडिट कार्ड असलेल्या शेतकऱ्यांसाठी बँकांना आवाहन केले आहे. ते म्हणाले की, केसीसी धारक शेतकऱ्यांना बँकांकडून सुलभ कर्ज उपलब्ध करून द्यावे.

Updated: Jul 8, 2022, 08:04 AM IST
किसान क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट; बँकांकडून मिळणार 'ही' सुविधा  title=

मुंबई : Nirmala Sitharaman on KCC: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी किसान क्रेडिट कार्ड असलेल्या शेतकऱ्यांसाठी बँकांना आवाहन केले आहे. ते म्हणाले की, केसीसी धारक शेतकऱ्यांना बँकांकडून सुलभ कर्ज उपलब्ध करून द्यावे.

Nirmala Sitharaman on KCC: तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल आणि तुमच्याकडे किसान क्रेडिट कार्ड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना खेड्यातील लोकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड (KCC) धारकांना सुलभ कर्ज देण्यास सांगितले.

कृषी कर्जामध्ये ग्रामीण बँकेची महत्त्वाची भूमिका

वित्त राज्यमंत्री भागवत के कराड म्हणाले, "अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि मासेमारी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात गुंतलेल्या सर्वांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) देण्याबाबत चर्चा झाली." 

ते म्हणाले, 'प्रादेशिक ग्रामीण बँकांवरील दुसर्‍या सत्रात, प्रायोजक बँकांनी त्यांना डिजिटायझेशन आणि तंत्रज्ञान सुधारण्यात मदत करावी असा निर्णय घेण्यात आला.
प्रादेशिक ग्रामीण बँकांची कृषी कर्जामध्ये महत्त्वाची भूमिका असते. त्याच्या प्रायोजक बँका सार्वजनिक क्षेत्रातील बँका (PSBs) आणि राज्य सरकारे आहेत.

सूत्रांनी सांगितले की, देशात एकूण 43 आरआरबी आहेत. यापैकी एक तृतीयांश RRB, विशेषत: ईशान्य आणि पूर्वेकडील प्रदेश, तोट्यात आहेत आणि 9 टक्के नियामक भांडवलाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी त्यांना निधीची आवश्यकता आहे.

या बँका RRB कायदा, 1976 अंतर्गत स्थापन करण्यात आल्या आहेत आणि त्यांचे उद्दिष्ट ग्रामीण भागातील लहान शेतकरी, कृषी कामगार आणि कारागीर यांना कर्ज आणि इतर सुविधा उपलब्ध करून देणे हे आहे.