लालूंवर टीका करताना नितीश कुमार यांची 'दबंगगिरी'

आधी लोकं वाघांना घाबरत होती, आता गायीला घाबरतात. हे सगळं मोदी सरकारचं देणं आहे

Updated: Nov 20, 2017, 11:46 PM IST
लालूंवर टीका करताना नितीश कुमार यांची 'दबंगगिरी' title=

पटणा : आधी लोकं वाघांना घाबरत होती, आता गायीला घाबरतात. हे सगळं मोदी सरकारचं देणं आहे, अशी टीका लालूप्रसाद यादव यांनी केली होती. या टीकेला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. गायसे नहीं, चारा खाने वालोंसे डर लगता है, असा दबंग डायलॉग नितीश कुमार यांनी लगावला आहे.

जगप्रसिद्ध सोनपूर जत्रेमध्ये यंदाच्या वर्षी कमी जनावरं आल्याचा आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला होता. लालूंच्या या आरोपाचं नितीश कुमार यांच्या पक्षानं खंडन केलं आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त जनावरं जत्रेत आल्याचा दावा जेडीयूनं केला आहे.