रमजानच्या महिन्यातही पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार

 या गोळीबारामुळे सीमेपासून  पाच किलोमीटर अंतरावरील शाळा तसंच संस्था बंद करण्यात आल्यात तसच नागरिकांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय.

Updated: May 23, 2018, 01:49 PM IST

श्रीनगर : पवित्र रमजानच्या महिन्यातही पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय. जम्मू काश्मीरच्या हीरानगर, सांबा, अरनिया आणि आरएसपुरा भागात पाकिस्तानी सैन्यानं गोळाबार केला. या गोळीबारात भारताचे २० नागरीक जखमी झालेत.. रमजान दरम्यान पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झालाय यात ५ नागरिकांचा  समावेश आहे तर २ जवान शहीद झालेत. अखनूरच्या पल्लनवाला मध्ये पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात एका ८ वर्षाच्या चिमुकल्याचाही मृत्यू झालाय. या गोळीबारामुळे सीमेपासून  पाच किलोमीटर अंतरावरील शाळा तसंच संस्था बंद करण्यात आल्यात तसच नागरिकांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय.