भारतातील अशी एकमेव ट्रेन ज्यामधून तुम्ही फ्री प्रवास करु शकता

आपल्यापैकी प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी ट्रेनने प्रवास केला असावा.

Updated: Apr 29, 2022, 05:14 PM IST
भारतातील अशी एकमेव ट्रेन ज्यामधून तुम्ही फ्री प्रवास करु शकता title=

मुंबई : आपल्यापैकी प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी ट्रेनने प्रवास केला असावा. ट्रेनचा प्रवास हा सर्वात स्वस्त आणि जलद असतो. ट्रेनने आपण लांबवर कुठेही प्रवास करु शकतो. ट्रेनमध्ये वेगवेगळ्या श्रेणीनुसार वेगवेगळे भाडे असते. म्हणून सर्वसामान्य व्यक्तींपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांच्याच खिशाला परवडणारी असते. पण तुम्हाला माहित आहे का की, अशी एक ट्रेन आहे ज्यामध्ये तुम्ही मोफत प्रवास करू शकता. चला तुम्हाला या स्पेशल ट्रेनबद्दल सांगतो.

ही ट्रेन हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या सीमेवर धावते. जर तुम्ही भाक्रा नांगल धरण बघायला गेलात, तर तुम्ही या ट्रेन प्रवासाचा मोफत आनंद घेऊ शकता.

वास्तविक ही रेल्वे नांगल ते भाक्रा धरणापर्यंत धावते. गेल्या 73 वर्षांपासून 25 गावांतील लोक या ट्रेनमधून मोफत प्रवास करत आहेत. तुम्ही विचार करत असाल की, एकीकडे देशातील सर्व ट्रेनचे तिकीट दर वाढवले, जात असताना दुसरीकडे लोक या ट्रेनमध्ये मोफत प्रवास का करतात आणि रेल्वे त्याला परवानगी कशी देते?

वास्तविक ही ट्रेन भाक्रा धरणाची माहिती देण्याच्या उद्देशाने चालवली जाते. जेणेकरून देशातील सर्वात मोठे भाक्रा धरण कसे बांधले गेले हे देशातील भावी पिढीला कळू शकेल. हे धरण बनवताना कोणत्या अडचणी आल्या, हे त्यांना कळायला हवे.

भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळ ही ट्रेन चालवते. हा रेल्वेमार्ग बनवण्यासाठी डोंगर कापून दुर्गम मार्ग तयार करण्यात आला आहे.

ही रेल्वे गेली 73 वर्षे धावत आहे. ते पहिल्यांदा 1949 मध्ये चालवण्यात आले होते. या ट्रेनमधून दररोज 25 गावातील 300 लोक प्रवास करतात. या ट्रेनचा सर्वाधिक फायदा विद्यार्थ्यांना होतो.

नांगल ते धरणापर्यंत ही ट्रेन धावते आणि दिवसातून दोनदा प्रवास करते. ट्रेनची खास गोष्ट म्हणजे तिचे सर्व डबे लाकडाचे आहेत. त्यात हॉकर किंवा तुम्हाला टीटीई मिळणार नाही.

ही ट्रेन डिझेल इंजिनवर चालते. या ट्रेनला एका दिवसात 50 लिटर डिझेल लागते. या गाडीचे इंजि एकदा सुरू झाले की, भाक्रा येथून परत आल्यानंतरच ती थांबते. या ट्रेनमधून भाक्रा येथील बरमाळा, ओलिंडा, नेहला भाकरा, हंडोळा, स्वामीपूर, खेडा बाग, कलाकुंड, नांगल, सालंगडी आदी परिसरातील गावांतील लोक प्रवास करतात.

ही ट्रेन नांगलहून सकाळी 7:05 वाजता निघते आणि सुमारे 8:20 वाजता ही ट्रेन भाकराहून नांगलच्या दिशेने परत येते. त्याच वेळी, पुन्हा एकदा दुपारी 3:05 वाजता नांगल येथून ट्रेन धावते आणि संध्याकाळी 4:20 वाजता भाक्रा धरणातून नांगलला परत येते. नांगलहून भाक्रा धरणापर्यंत पोहोचण्यासाठी ट्रेनला 40 मिनिटे लागतात.

ही ट्रेन जेव्हा सुरू झाली तेव्हा, त्याचे 10 डबे चालायचे, पण आता या ट्रेनला फक्त 3 डबे आहेत. या ट्रेनमध्ये एक डबा पर्यटकांसाठी आणि एक महिलांसाठी राखीव आहे.