स्वाभिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा - विहिंप

 देशातील अनेक प्रदेशात शेतकऱ्यांची परिस्थिती चांगली नाही. शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

Updated: Jun 19, 2017, 03:47 PM IST
स्वाभिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा - विहिंप title=

नागपूर :  देशातील अनेक प्रदेशात शेतकऱ्यांची परिस्थिती चांगली नाही. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. ज्यामुळे सरकारने  स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे.

विश्व हिंदू परिषदेचे सहसचिव आणि प्रवक्ते सुरेंद्र जैन यांनी नागपूरमध्ये बोलताना सांगितलं की, भाजप सरकारने सत्तेत येण्यापूर्वी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचं दिलेले आश्वासन पाळावं. 

तसेच पोलीस आणि सरकार गोरक्षा करण्यात अपयशी ठरल्यामुळेच गोरक्षा रस्त्यावर उतरून गोरक्षा करतात, अशा गोरक्षकांवर अनेक ठिकाणी खोटे खटले दाखल करण्यात आल्याचा आरोप जैन यांनी यावेळी केला.