रात्रीच्या अंधारात पत्नी प्रियकराला भेटली, पतीला कळताच त्याने घेतला वेगळाच निर्णय

Love Affair News Today: लग्नानंतर पत्नीचा दुसऱ्याच मुलावर जीव जडला. त्यानंतर पतीने केलं असं काही की. 

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 17, 2023, 03:28 PM IST
रात्रीच्या अंधारात पत्नी प्रियकराला भेटली, पतीला कळताच त्याने घेतला वेगळाच निर्णय title=
Husband in Bihar Begusarai allows wife to marry lover in marathi

Love Affair News Today: पत्नीच्या अफेअरबद्दल कळताच पतीने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. बिहारच्या बेगुसरायमध्ये चित्रपटाला लाजवेल अशी घटना घडली आहे. पत्नीच्या अफेअरबद्दल कळताच पतीने तिच्या प्रियकरासोबत तिचे लग्न लावून दिले आहे. त्याचबरोबर दोन मुलांची जबाबदारीही स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. बेगुसरायमधील दहिया गावात मंगळवारी ही घटना घडली आहे. पतीने केलेला त्यागाची सध्या चर्चा आहे. (Husband And Wife News)

दहिया गावात राहणाऱ्या अजय कुमारचे लग्न पाच वर्षांपर्वी तेघरा गावात राहणाऱ्या काजल कुमारीसोबत झाले होते. लग्नानंतर दोघांचे आयुष्यही सुरळीत सुरू होते. दोघांचा संसार सुखाचा सुरू होता, मात्र, पत्नी लग्नानंतर तिचे पहिले प्रेम विसरु शकली नव्हती. ती प्रियकराला लपून छपून भेटत राहिली. महिलेच्या पतीला मात्र याची तसूभरही कल्पना नव्हती. एकदा महिलेने तिचा प्रियकर राजकुमार ठाकुर याला रात्री भेटण्यासाठी बोलवले. 

राजकुमार नेहमीप्रमाणे तिला भेटण्यासाठी आला होता. मात्र, महिलेच्या पतीला व गावकऱ्यांना याची माहिती लागली. महिला तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी गेली तेव्हाच गावकऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले. गावकऱ्यांनी दोघांचीही चौकशी केली असती त्यांनी दोघांचेही प्रेम असल्याचे कबुल केले. महिलेने पतीच्या समोरच दोघांचे नाते कबुल केले. तसंच, मी प्रियकरासोबतच जास्त खुश राहू शकेल, असंही कबुल केले. 

महिलेने पतीच्या ऐवजी प्रियकराची निवड केल्यानंतर संपूर्ण गावकऱ्यांमध्ये एकच आश्चर्य उमटले. मात्र, पतीने पत्नीच्या आनंदासाठी संपूर्ण समाजाच्या विरोधात जाऊन त्यांने गावातील शिव मंदिरात दोघांचे लग्न लावून दिले. इतकंच नव्हे तर, दोन मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारीदेखील उचलली. हे अनोखे लग्न पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक मंदिरात उपस्थित होते. 

गावचे सरपंच सागर सहनी यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. सोमवारी रात्री गावातील लोकांना एक प्रियकर त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी येणार असल्याची सूचना मिळाली. या जोडप्याला महिलेच्या सासरच्या लोकांनी व समाजातील नागरिकांनी रंगेहाथ पकडले. काजल देवीने कबुल केलं आहे की, तिनेच प्रियकराला भेटण्यासाठी बोलवले आहे. ते गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत आहेत आणि त्यांना पुढे एकत्र राहायचे आहे. पती आणि सासरच्या मंडळींसह समाजातील लोकांनी परवानगी दिल्यानंतर त्यांचे लग्न लावण्यात आले आहे