खालेल्या मिठाला जागलं पाहिजे, आपण असं नेहमी म्हणतो, परंतु काय आहे मिठाचा इतिहास वाचाच

मीठाचा वापर कधीपासून सुरु झाला. काय आहे मीठाचा इतिहास. जाणून घ्या

पोपट पिटेकर | Updated: Oct 19, 2022, 12:20 AM IST
खालेल्या मिठाला जागलं पाहिजे, आपण असं नेहमी म्हणतो, परंतु काय आहे मिठाचा इतिहास वाचाच title=

पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : जेवणात जगात सर्वात जास्त वापरली जाणारी वस्तू म्हणजे मीठ (salt). मीठाने मानवी इतिहासाचा मार्गच बदलला आहे. युद्धांचा मार्ग सेट करण्यापासून ते अर्थव्यवस्थांना आकार देण्यापर्यंत मीठाचं मोठं योगदान (Major contribution of salt) आहे. आपल्याला डॉक्टर नेहमी सांगतात की जास्त मीठ आरोग्यासाठी हानिकारक (Salt is harmful to health) आहे. तुम्ही ही हे ब-याच वेळा ऐकले असेल आणि तुम्ही संतुलन साधण्याचा प्रयत्न केला असेल. आज आपण या मिठाचा इतिहास (History of Salt) जाऊन घेणार आहोत. पंरतु आम्ही तुम्हाला महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) दांडी मीठ आंदोलना (Dandi Salt Movement) बद्दल सांगणार नाही. परंतु मानवांनी मीठ कसे वापरण्यास सुरुवात केली. आणि ते थेट आपल्या जेवणाच्या टेबलवर कसं विराजमान झालं. चला पाहूयात.. (History of Salt)

मीठ शब्दाचा वापर

मानवाने मिठाचा वापर केव्हा सुरू केला हे कोणालाही माहिती नाही. परंतु इतिहासकारांचा अंदाज आहे की मिठाचा वापर (Use of salt) 5 हजार ते 10 हजार वर्षांपूर्वी वाढू लागला. या काळात वाढलेली शिकार, (hunting) वाढलेली लोकसंख्या (Population) आणि हवामानातील बदलामुळे वाढलेली शेती (agriculture)यामुळे मीठाचा वापर वाढला. ग्रीक आणि संस्कृत (Greek and Sanskrit), ज्या काही सर्वात जुन्या रेकॉर्ड केलेल्या इंडो-युरोपियन भाषा आहेत. दोन्हीमध्ये मीठाचा शब्द वापरला आहे. तर त्यापूर्वी कोणत्याही भाषेत मीठासाठी शब्द नव्हता.

मांस टिकवण्यासाठी मीठाचा वापर

मीठाचा वापर अनेक प्रकारे होत असे. परंतु मांस टिकवून ठेवण्याच्या क्षमतेमुळे संसाधन म्हणून मीठाचे महत्त्व खूप वाढले. मांस हा एक मौल्यवान स्त्रोत होता आणि कोणालाही ते वाया घालवायचे नव्हता. त्यामुळे मीठाचा वापर करुन मांस जास्त ठिकवले जात असे. मीठ बॅक्टेरिया (Salt bacteria) आणि इतर सूक्ष्मजंतूंना मारते (Kills microbes) आणि एकदा मांसावर (on meat) भरपूर मीठ किंवा मीठ आणि व्हिनेगर मिसळल्यानंतर ते अनेक महिने टिकू शकते. खरं तर, याकुत्स्क आणि अंटार्क्टिका या पृथ्वीवरील सर्वात थंड प्रदेशातील रहिवासी अजूनही अनेक महिने अन्न (food) टिकवून ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मीठचा वापर करतात.

मिठाच्या व्यापारावर ब्रिटिश वर्चस्व

19व्या शतकात मिठाच्या व्यापारावर ब्रिटिशांचे वर्चस्व मोठ्या प्रमाणात होते. अमेरिकेच्या दक्षिणेकडील बंदरांवरून मीठ मोठ्या प्रमाणात निर्यात (Export of salt) केले जात असे. जेव्हा अमेरिकन गृहयुद्ध (American Civil War) सुरू झाले तेव्हा दक्षिणेतील प्रत्येक सैनिकासाठी यूएस कॉन्फेडरेसी मासिक मीठ भत्ता (Monthly salt allowance) 1.5 पौंड होता. म्हणजे सुमारे 600 ग्रॅम मीठ होतं. दैनंदिन वापरामध्ये हे पाहिल्यास 23 ग्रॅम मीठ आहे. जे सध्याच्या 3-6 ग्रॅम अन्नाच्या मर्यादेपेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे या सैनिकांना मीठ (Salt to soldiers)आणि खारट पदार्थांचे खूप व्यसन असल्याचं सिध्द होतं.

मिठाचं ऐतिहासिक महत्त्व

भारताच्या मिठाची स्वतःची एक अनोखी कथा (sold a unique story) आहे. एकेकाळी ब्रिटिशांची मिठाची मक्तेदारी भारतीय वसाहतीत विस्तारली होती. 1835 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने (East India Company) भारतीयांवर मिठाचा मोठा कर (Salt tax on Indians)लादला, जो ब्रिटीश मिठाच्या मक्तेदारीच्या विरोधात 12 मार्च 1930 ते 6 एप्रिल 1930 पर्यंत महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) नेतृत्वाखालील दांडी मीठ (Bark salt) मोर्चाच्या प्रतिकार आणि अहिंसक चळवळीनंतर संपला.

मीठ, सत्ता आणि संपत्ती

ज्यांनी मीठ नियंत्रित केली त्यांनी सत्ता आणि संपत्ती (Power and wealth) नियंत्रित केली. ज्याप्रमाणे पैशाने आपण अन्न, घरे आणि सुविधा विकत घेऊ शकतो. त्याचप्रमाणे मीठाने मानवांना त्यांचे कष्ट कमी करण्याची, दीर्घ काळासाठी अन्न टिकवून (preserving food) ठेवण्याची आणि मानवांसाठी संपूर्ण जीवन चांगले करण्याची संधी दिली. मीठ माफिया (Salt Mafia)आणि मीठ तस्कर (salt smuggler) हे त्या काळात वेगळे नव्हते.

मीठ, आहार आणि आरोग्य

मिठाचा वापर हे खाण्यायोग्यच केला पाहिजे. कारण मिठाचा थेट परिणाम रक्तदाबाशी (Salt and blood pressure) होतो. आहारात सोडियमचे जास्त सेवन केल्याने रक्तदाब वाढू शकतो. आणि यामुळे धमन्या, हृदय आणि रक्तवाहिन्यांचे (Arteries, heart and blood vessels) दीर्घकाळ नुकसान होऊ शकते. आहारात मीठ कमी ठेवल्याने रक्तदाब तर नियंत्रणात राहतोच पण हृदयाचे आरोग्यही (Heart health) सुधारते. याशिवाय असे दिसून आले आहे की जे लोक आहारात मिठाचे प्रमाण कमी ठेवतात, ते जास्त काळ जगतात. (Eat less salt and live longer) त्यामुळे तुम्ही देखील मीठाचा योग्य वापर करा. आणि आपलं आरोग्य संभाळा.