'जम्मू-काश्मीरला युद्धाचा आखाडा बनवू नका'

पाकिस्तानकडून सातत्याने होत असलेल्या गोळीबारामुळे नियंत्रण रेषेवर युद्धसदृश वातावरण निर्माण झालंय.

Updated: Jan 21, 2018, 10:35 PM IST
'जम्मू-काश्मीरला युद्धाचा आखाडा बनवू नका' title=

बारामूला : पाकिस्तानकडून सातत्याने होत असलेल्या गोळीबारामुळे नियंत्रण रेषेवर युद्धसदृश वातावरण निर्माण झालंय. सीमेवर एक प्रकारे रक्ताची होळी खेळली जात असल्याची खंत जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी व्यक्त केली.

जम्मू काश्मीरला युद्धाचा आखाडा बनवू नका. भारत-पाकिस्तानमध्ये मैत्रीचा सेतू निर्माण करा असं आवाहन मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांना केलं. बारामूला येथे पोलीस कॉन्स्टेबल पासिंग आऊट परेडला संबोधित करताना मेहबूबा मुफ्ती यांनी हे आवाहन केलं.