Cyclone Yaas : भयानक यास चक्रीवादळाचा डबल अ‍ॅटॅक! रेल्वेने या 25 गाड्या केल्या रद्द

सध्या  Tauktae चक्रीवादळाच्या विध्वंसातून देश सावरलेला नसताना आता आणखी एक भयानक चक्रीवादळ Yaas येत आहे. त्याची वाटचाल सुरु झाली आहे. 

Updated: May 24, 2021, 09:22 AM IST
Cyclone Yaas : भयानक यास चक्रीवादळाचा डबल अ‍ॅटॅक! रेल्वेने या 25 गाड्या केल्या रद्द  title=
संग्रहित छाया

 मुंबई : सध्या  Tauktae चक्रीवादळाच्या विध्वंसातून देश सावरलेला नसताना आता आणखी एक भयानक चक्रीवादळ Yaas येत आहे. त्याची वाटचाल सुरु झाली आहे. ते पश्चिम बंगालच्या दिशेने येणार आहे. हे यास चक्रीवादळ भयंकर असणार आहे, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. भारताच्या पश्चिम भागात Tauktae वादळाने जोरदार तडाखा दिला. होत्याचे नव्हते केले. आता पूर्व भागात यासचा धोका वाढत आहे. हे  वादळ 26 मे रोजी ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. दरम्यान, धोका लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने 25 गाड्या रद्द केल्या आहेत.

बंगाल आणि ओडिशामध्ये मुसळधार पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागराच्या मध्य पूर्व भागात कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. हे वादळ आज 24 मे पर्यंत रूप धारण करील. यास हे  चक्रीवादळ उत्तर, वायव्य दिशेने जाईल आणि 26 मे पर्यंत चक्रीवादळाच्या वादळात बदलू शकेल. पुढील 24 तासांत, हे वादळ चक्रीवादळाचे रुप घेईल. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार बंगाल आणि ओडिशा येथे 26 मेपर्यंत मुसळधार पाऊस पडेल.

चक्रीवादळाचा ताशी वेग 155-165 किमी  

चक्रीवादळ यास दरम्यान, 24 मे रोजी वाऱ्याचा वेग ताशी 40-50 किमी राहील. त्याच वेळी 25 मे रोजी वाऱ्याचा वेग ताशी 50-60 किमी राहील. 26 मे च्या दिवशी सकाळी यास वादळाची गती ताशी 60-70  किमी असू शकतो तर 26 मे रोजी दुपारी वादळाची गती ताशी  90-110 किमी पर्यंत वाढू शकते. 26 मे च्या संध्याकाळ पर्यंत वादळाची वेग ताशी 155-165 किमी पर्यंत जाऊ शकतो.

भारतीय रेल्वेने या 25 गाड्या रद्द केल्या

चक्रीवादळ यासचा धोका लक्षात घेता भारतीय रेल्वेने 24 मे ते 29 मे दरम्यान 25 गाड्या रद्द केल्या आहेत. रद्द केलेल्या सर्व 25 गाड्यांची यादी रेल्वे प्रेस  नोट जारी करुन ही माहिती दिली आहे.

 पंतप्रधान यांनी वादळाच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावली

 यावेळी वादळाचा मोठा धोका भारताच्या पूर्वेकडील भागात असणार आहे. या वादळाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी बैठक बोलावली. या बैठकीत पंतप्रधानांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.  पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना किनाऱ्यावरील कामात गुंतलेल्यांना वेळीच बाहेर काढण्यास सांगितले आहे. 

भारतीय नौदलाची कंबर कसली

यास चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी भारतीय नौदलही पुढे आले आहे. पूर्वेकडील किनाऱ्यावर नौदलाने चार जहाजे व विमान तैनात करुन ठेवली आहेत. या व्यतिरिक्त बचाव पथक तसेच वैद्यकीय पथकालाही तयार राहण्यास सांगितले आहे. विशाखापट्टणममधील आयएनएस डागा आणि चेन्नईतील आयएनएस रजालीही कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार आहेत.

यास वादळाशी संबंधित 15 मोठ्या ठळक बाबी

- आज वादळ यास बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचेल
- 26 मे रोजी ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारा ओलांडेल
- रविवारी पंतप्रधानांची उच्चस्तरीय आढावा बैठक
- रविवारी हवाई दलाने 21 टन मदत पुरवठा  
- वायुसेनेने एनडीआरएफच्या 334 जवानांचीही वाहतूक केली
- कोलकाता, पोर्ट ब्लेअर, जवानांची टीम तैनात
- ओडिशामधील 14 जिल्ह्यात हाय अलर्ट जारी
- एनडीआरएफच्या 22 टीम ओडिशामध्ये तैनात  
- वादळामुळे भारतीय रेल्वेने 25 गाड्या रद्द केल्या
- चक्रीवादळाचा वेग 155-165 किमी / तास असणे अपेक्षित  
- वेग देखील 185 किमी / तासापर्यंत असू शकतो.
- 4 नौदलाची जहाजे बचाव-बचावासाठी तयार  
- विशाखापट्टणममध्ये आयएनएस डागा आणि आयएनएस रजालीही सज्ज आहेत
- 11 हवाई दलाची वाहतूक विमान आणि 25 हेलिकॉप्टर सज्ज  
- यास वादळाचा प्रभाव बिहार आणि झारखंडमध्येही दिसू शकतो