Omicron: कोविड-19 चे निर्बंध 31 डिसेंबरपर्यंत वाढवले, केंद्राने राज्यांना दिले हे निर्देश

केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी पत्र पाठवून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 25 नोव्हेंबर रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) जारी केलेल्या सल्ल्याचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले.

Updated: Nov 30, 2021, 06:04 PM IST
Omicron: कोविड-19 चे निर्बंध 31 डिसेंबरपर्यंत वाढवले, केंद्राने राज्यांना दिले हे निर्देश title=

नवी दिल्ली : केंद्र सरकारने  (Central Government) मंगळवारी ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या  (Omicron Variant) पार्श्वभूमीवर देशव्यापी कोविड-19   (Coronavirus)प्रतिबंधात्मक उपाय 31 डिसेंबरपर्यंत वाढवले ​​आहेत आणि राज्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी पत्र पाठवून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 25 नोव्हेंबर रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) जारी केलेल्या सल्ल्याचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले.

या अॅडव्हायझरीमध्ये सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे काटेकोर निरीक्षण आणि तपासणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. भल्ला यांनी असेही सांगितले की, जे लोक आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संपर्कात आले आहेत त्यांचा शोध घेतला पाहिजे आणि आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांची तपासणी केली पाहिजे. तसेच, भारतीय SARS-CoV-2 Genome Group Guidance Document (INSACOG) नुसार, अशा प्रवाशांचे नमुने ताबडतोब नियुक्त केलेल्या जीनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळांमध्ये पाठवले जावेत.

ते म्हणाले की, राज्यांतील अधिकाऱ्यांनी जीनोम विश्लेषणाच्या निकालांना वेग देण्यासाठी जीनोम तपास प्रयोगशाळांशी समन्वय स्थापित केला पाहिजे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी चिंताजनक ओमिक्रॉनचे रुग्ण आढळल्यास तातडीने आवश्यक सार्वजनिक आरोग्य उपाययोजना कराव्यात. सध्याच्या कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजना 31 डिसेंबरपर्यंत सुरू ठेवाव्यात, असे निर्देश गृह सचिवांनी दिले आहेत.

याशिवाय, मंगळवारी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत आढावा बैठक घेतली आणि ओमिक्रॉनची प्रकरणे लवकर ओळखण्यासाठी त्यांची चाचणी त्वरीत करण्याचा सल्ला दिला. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, नवीन प्रकार RT-PCR आणि RAT चाचण्यांमध्ये दिसू शकत नाही. त्यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पुरेशा पायाभूत सुविधांची खात्री करण्याचे आणि होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले.

मंगळवारी आरोग्य मंत्रालयाच्या अद्ययावत आकडेवारीनुसार, भारतात कोरोना विषाणू संसर्गाची 6,990 नवीन प्रकरणे आल्यानंतर एकूण संक्रमित लोकांची संख्या 3,45,87,822 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, सक्रिय रुग्णांची संख्या 1,00,543 वर आली आहे. याशिवाय 190 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 4,68,980 वर पोहोचला आहे.