Adani Power : अदानी पावरमध्ये 70 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार, गौतम अदाणी यांची मोठी घोषणा

आपल्या व्यवसायाच्या संदर्भात मिळालेल्या संकेतांवरून भारताच्या अर्थव्यवस्थेची 8 टक्के अंदाजित वाढ प्रत्यक्ष पहायला मिळेल", असा विश्वास अदाणी यांनी व्यक्त केला.    

Updated: Jul 26, 2022, 10:48 PM IST
Adani Power :  अदानी पावरमध्ये 70 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार, गौतम अदाणी यांची मोठी घोषणा title=

मुंबई : जग आज घडीला ज्या वातावरणातून जात आहे त्याला "अनिश्चित" म्हणंही पुरेसं होणार नाही. वाढती महागाई, विस्कळीत अन्नधान्य पुरवठा, विस्थापन, अपुरी आरोग्य सेवा, शिक्षण क्षेत्रातील तोच तोचपणा, चलन बाजारातील अस्थिरता आणि अडखळती रोजगार निर्मिती या साऱ्या लक्षणांमधून विविध पातळ्यांवर आलेल्या संकटांच्या घातक परिणामांशी सामना करण्याची सर्वच देशांची क्षमता पणाला लागलीय. (70 billion dollars will invest in adani group power gautam adani big announcment)

भारताने कोव्हिडची स्थिती इतर देशांच्या तुलनेत उत्तमरित्या हाताळली,  हे नाकरता येणार नाही. कोरोनाच्या या आव्हानात्मक 18 महिन्यांमध्ये भारतात प्रतिबंधक लसीचे 200 कोटी डोस दिले गेले.  ही संख्या उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि युरोपच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. यातून जगाला बोध मिळाला असेलच.  कितीही कठीण परिस्थिती असली तरी भारत त्यातून सावरून पुन्हा उभा राहू शकतो हेच यातून सिद्ध झाले आहे . भारताने यातून  कितीही आव्हानात्मक आणि कठीण परिस्थिती असली तरी कसं उभ राहायचं हे दाखवून दिलं.

भारताने सध्याच्या रशिया-युक्रेन संघर्षांत कोणतीही बाजू न घेता ठाम भूमिका घेतली आहे. या राजकीय भूमिकेतून दिसलेल्या आत्मविश्वासाबद्दल प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला पाहिजे. भविष्यातील बहुध्रुवीय आंतरराष्ट्रीय स्थितीत भारत अभिमानाने आपले स्थान टिकवेल याचं हे द्योतक आहे. 

आपल्याला अनेकदा वातावरणातील बदलांबाबत उपदेश केला जातो. पण भारताने कोव्हिडच्या काळात आणि ऊर्जा संकट असूनही पुनर्वापर करण्याच्या स्रोतांपासून वीज निर्मितीत वाढ केली आहे. अनेक विकसित देशांनी त्यांची पुनर्वापरक्षम वीजनिर्मितीची उद्दिष्टं स्थगित ठेवली. त्यातच भारताने केलेली हे कामगिरी उल्लेखनीय आहे. पुनर्वापर करण्याच्या स्रोतांपासून होणाऱ्या वीज निर्मितीची भारताची क्षमता 2015 पासून आजवर 300 टक्क्यांनी वाढली आहे. अशा वीजनिर्मिती भारतात 2021-22 मध्ये 2020-21 च्या तुलनेत 125 टक्के भांडवल गुंतवण्यात आलंय.  विजेच्या वाढीव मागणीपैकी 75 टक्क्यांहून जास्त मागणी पुनर्वापरक्षम स्रोतांपासून निर्मिली जात आहे. ही प्रगती रोखणं आता कोणालाही शक्य नाही.

भारताने या सर्व पार्श्वभूमीवर समतोल साधला. या उल्लेखनीय वाटचालीचं संपूर्ण क्षेय हे सरकारला द्यावं लागेल. कोरोनातून सावरताना अनेक देशांना मंदीचा सामना करावा लागला. या मंदीतूनच अनेक देशांनी स्वत:ला सावरत पुन्हा भरारी  घेत आहेत. मात्र या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करतेय. आपल्या व्यवसायाच्या संदर्भात मिळालेल्या संकेतांवरून भारताच्या अर्थव्यवस्थेची 8 टक्के अंदाजित वाढ प्रत्यक्ष पहायला मिळेल", असा विश्वास अदाणी यांनी व्यक्त केला. 

"अदाणी समूहाच्या दृष्टीने 2021-22 हे वर्ष महत्वपूर्ण होतं. आपल्या भूतकाळाबद्दलचा अभिमान आपली भविष्यातील क्षमता अधोरेखित करतो.  त्यातूनच आपण सध्या नव्या योजनांची आखणी करतोय. भारतात गुंतवणूक करण्याच्या आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. या गुंतवणुकीचा वेग कमी झालेला नाही. आमच्या व्यवसायाची व्याप्ती, वैविध्य आणि सातत्यपूर्ण कामगिरी याच आधारावर आम्ही भविष्यात चांगली प्रगती करण्यासाठी सज्ज असल्याचं अदाणींनी नमूद केलं. 

देशाच्या आणि देशवासियांच्या आकांक्षांबद्दल आम्हाला वाटणारी श्रद्धाच आत्मविश्वास देते. भारताच्या प्रगतीशी संलग्न धोरणांचा स्वीकार हेच अदाणी समूहाच्या यशाचे गमक आहे.  प्रगतीची संधी भारताइतकी अन्य कोणत्याही देशाला नाही, असं स्पष्ट आणि तितकंच ठामपणे अदाणी यांनी सांगितलं.

"भविष्यातील प्रगतीबद्दलचा आमचा विश्वास अधोरेखित करणारा पुरावा म्हणजे हरित ऊर्जा. क्षेत्राकडील भारताच्या वाटचालीला सहाय्य करण्यासाठी केलेली ७० अब्ज डॉलर गुंतवणूक. जगातील प्रमुख सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या यादीमध्ये आम्ही याआधीच स्थान मिळविलं आहे. या क्षेत्रातील आमच्या क्षमतेच्या आधारावर आम्हाला भविष्यात हायड्रोजन वायू इंधन म्हणून वापरण्यासाठीच्या प्रयत्नांत मोठं योगदान देता येईल. खनिज तेल आणि वायूवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेला देश ते भविष्यात हरित ऊर्जा निर्यात करणारा देश या भारताच्या परिवर्तनात आमची आघाडीची भूमिका असेल", असंही अदाणींनी सांगितलं.

"पुनर्वापरयोग्य ऊर्जेच्या बाबतीत आमचे जगातील स्थान बळकट होत असले तरी गेल्या १२ महिन्यांत इतर अनेक उद्योगात आम्ही लक्षणीय प्रगती साधली आहे. आम्ही आता देशातील सर्वात मोठी विमानतळ व्यवस्थापन कंपनी आहोत. आमच्या व्यवस्थापनातील विमानतळाच्या सभोवतीच्या परिसरात नवी वित्तीय केंद्रे वसविण्याच्या प्रक्रियेत आम्ही आहोत."

"भारतातील पायाभूत सुविधा विकासाच्या प्रक्रियेत आम्ही सहभागी आहोत. देशातील सर्वात मोठ्या रस्ते बांधणी प्रकल्पांबरोबरच, बंदरे, मालवाहतूक व्यवस्थापन, वीज पारेषण आणि वितरण, पाईपलाइन द्वारे पुरवण्याचा गॅस अशा व्यवसायांमध्ये आमचा मोठा हिस्सा आहे. अदाणी विल्मारच्या यशस्वी समभाग विक्रीनंतर आम्ही देशातील सर्वात मोठी ग्राहकोपयोगी वस्तू विकणारी कंपनी झालो आहोत. होलसिम चा व्यवसाय विकत घेतल्यामुळे  ज्यात ए सी सी आणि अंबुजा सिमेंट या नामवंत कंपन्यांचा समावेश आहे." 

"आता देशातील दुसऱ्या क्रमांकाचं सिमेंट उत्पादक झालोत. संलग्न व्यवसाय या आधारावर धंदा वाढविण्याच्या आमच्या धोरणाचे हे एक उदाहरण आहे. याशिवाय डेटा सेंटर, डिजिटल सुपर ऍप आणि संरक्षण, विमान निर्मिती, धातू, आणि औद्योगिक सामग्री यांसारख्या सरकारच्या "आत्मनिर्भर भारत" धोरणाशी सुसंगत व्यवसायातही आम्ही प्रवेश केला आहे."

"आमच्या उद्योगसमूहाचे एकत्रित बाजारमूल्य यावर्षी 200 अब्ज डॉलर पेक्षाही जास्त होते. आम्ही आंतरराष्ट्रीय बाजारातून अब्जावधी डॉलरचं भांडवल उभे राहू शकलो. भारताने यातूनच  आणि अदाणी समूहाबद्दल असलेला विश्वास दिसून येतो. आमचे व्यावसायिक यश आणि प्रगती यांची दखल जगभरात घेतली गेली आहे. अनेक परदेशी सरकारे आता आम्हाला त्यांच्या देशांत उद्योग काढून तेथील पायाभूत सुविधा सुधारण्याचा आग्रह करत आहेत."  

"आम्ही यामुळेच 2022 या वर्षात भारताच्या सीमा ओलांडून इतर देशात व्यवसाय करण्याची पायाभरणी केलीय. आमच्या कंपन्यांच्या वाढत्या बाजार मूल्याच्या मुळाशी आमच्याकडील रोख उपलब्धतेची दमदार वाढ, हा मुद्दा आहे. सर्वोत्तम व्यवहार आणि क्षमतेत सततची वाढ यामुळे आमच्या करपूर्व उत्पन्नात 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकूण व्यवसायाचे करपूर्व उत्पन्न 42 हजार 623 रुपये एवढे होते. ही वैविध्यपूर्ण व्यवसायवृद्धी आमच्या सर्वच व्यवसायांच्या बाबतीत दिसून आली." 

"आमच्या वीज व्यवसायात 26 टक्के वाढ झाली, वाहतूक व्यवस्थापन व्यवसाय 19 टक्के वाढला, ग्राहकोपयोगी वस्तू व्यवसाय 34 टक्के वाढला आणि अदाणी एंटरप्रायझेस (AEL) हा मूळ व्यवसाय 45 टक्क्यांनी वाढला. या कंपनीच्या खास व्यवसाय पद्धतीला तोड नाही.आम्ही त्या आधारे आणखीही प्रगती करणार आहोत. AEL ची जोमदार प्रगती हा समूहाच्या सततच्या उत्कर्षाचा आणि येत्या दशकातील भरभराटीचा पाया ठरेल", असंही अदाणी यांनी विश्वासाने सांगितलं.   

मागे वळून पाहता आम्हाला समाधान वाटतं. पण आत्ताच आम्ही खरा जोर धरलाय.  आम्ही  गेल्या 2 दशकांत जी प्रगती केली, त्यामुळे आणि पायाभूत सुविधांच्या परिसरात केलेल्या व्यवसाय विकासामुळे आम्ही देशातील सर्वात मोठी एकात्मिक पायाभूत सुविधा कंपनी म्हणून उदयाला आलोत. यातूनच आमची अनेक व्यवसायांचा एकत्रित पाया ( ‘platform of platforms’ ) अशी ख्याती झाली. त्यामुळे आम्हाला भारतीय ग्राहकांच्या अगदी जवळ जाणं शक्य झालं. येत्या अनेक दशकांत अन्य व्यवसाय (B2B) आणि ग्राहक (B2C) या दोन्हींशी संलग्न राहत प्रगती करण्याची क्षमता असलेली इतर कोणतीही कंपनी माझ्या डोळ्यांसमोर नाही", असंही अदाणींनी स्पष्ट केलं.

"भागधारक मित्रहो, मी एक हट्टी आशावादी आहे. उद्योजक म्हणून कसं विकसित व्हायचं आणि उत्कर्ष साधायचा याचं शिक्षण देणारा भारत हा एक बलशाली देश आहे, यावर माझी कायमच श्रद्धा आहे. आजच्या तरुणांमध्ये मला आपले आर्थिक सामर्थ्य पुन्हा मिळवून जगाच्या व्यवहारांत एक महत्वाचा देश म्हणून भारताला स्थान मिळवून देण्याची ऊर्मी स्पष्ट दिसते आहे. मी याआधी ही म्हटलंय की जगातील सर्वात मोठा मध्यमवर्ग भारतात असेल आणि या स्थितीला काम करण्याच्या आणि सुखी जीवन उपभोगण्याच्या वयाच्या व्यक्ती जास्त संख्येने असल्याची जोड ही ताकद अनेक दशके टिकून राहणारी आहे. लोकसंख्येत तरुण व्यक्तींची संख्या जास्त असण्याचा भारताच्या आर्थिक प्रगतीवर चांगला फायदा होणार आहे. यातच अधिक प्रशिक्षित, सुशिक्षित, अधिक सुदृढ आणि तंत्रज्ञानाचा कुशल वापर करणारा कर्मचारीवर्ग उदयाला येईल. आपल्या आकांक्षांची पूर्ती करीत जीवनाची पातळी उंचावेल. हे चित्र येत्या दशकात प्रत्यक्ष मला काहीही शंका नाही". 

"मला 2022 या वर्षाचं माझ्या वैयक्तिक दृष्टीने असलेलं महत्त्व सांगायचंय. या वर्षी माझे वडील आणि आदर्श शांतीलाल अदाणींचे जन्मशताब्दी वर्ष आहे. माझंही षष्ट्यब्दीपूर्तीचं वर्षय. अदाणी कुटुंबाने यानिमित्ताने एकत्रितपणे मुख्यतः ग्रामीण भागात आरोग्य, शिक्षण आणि कौशल्य विकास यासाठी 60 हजार कोटी रुपयांची रक्कम स्वयंसेवी संस्थांना देण्याचा निर्णय घेतला आहे". 

"या तिन्ही क्षेत्रांचा स्वतंत्र विचार न करता एकत्रितपणे केला पाहिजे.  कारण, संतुलित आणि भविष्याला सामोरं जाण्याला सिद्ध समाज निर्माण करण्याची ताकद त्यांच्यात आहे. दारिद्र्य रेषेखाली असलेल्या कोट्यवधी भारतीयांना कायमचं वर आणण्याची आपल्याला संधी आहे. हे आपले आपल्याला तसेच देशासाठीचे दायित्व आहे. मोठ्या प्रकल्प उभारणीचा आमचा अनुभव आणि अदाणी न्यासाने हाती घेतलेली विविध कामे यातून मिळालेल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा लाभ आम्हाला मिळेल आणि समाजाच्या सर्वात गरजू घटकांपर्यंत आमच्या कामाचा फायदा पोहचेल".

"माझा देशाबद्दलचा आशावाद आजच्याइतका उंच कधीच नव्हता.  नव्याने उभे राहण्याच्या जिद्दीतून आशावाद निर्माण होतो.  स्वतः वरील विश्वासातून ही जिद्द जन्मते आणि हा विश्वास म्हणजेच आशावाद ठरतो.  आमच्या बाबतीत असं म्हणता येईल. भारतात दिसणारी नवनिर्मितीची जिद्द, देशातल्या लोकांच्या डोळ्यांत दिसणारा आशावाद आणि भारताच्या प्रगतीबद्दल दृढविश्वास ही अदाणी समूहाच्या व्यवसायाची प्रेरणा आहे".