अपघात झाल्यावर सर्वात आधी काय कराल शिवाय इतरांचा जीव कसा वाचवाल? जाणून घ्या

अपघात झाल्यानंतर कसा वाचवला जीव. काय घ्यावी काळजी.

Updated: Sep 7, 2022, 11:16 PM IST
अपघात झाल्यावर सर्वात आधी काय कराल शिवाय इतरांचा जीव कसा वाचवाल? जाणून घ्या title=

मुंबई : भारतातील श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत येणारे सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांच्या अपघाती निधनाने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. भारतात दरवर्षी ४.४ लाख रस्ते अपघात (Raod Accident) होतात, त्यापैकी एक चतुर्थांश घटनांमध्ये मृत्यू होतात. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे. टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरल मिस्त्री यांचा महाराष्ट्रातील पालघर येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाल्यानंतर या विषयावरील चर्चेला जोर आला आहे. अशा परिस्थितीत रस्ता अपघात झाल्यास काय करावे आणि या काळात मृत्यू कसा टाळता येईल, हे जाणून घेणे प्रत्येकाने महत्त्वाचे आहे.

रोड सेफ्टीवरील 2019 च्या WHO ग्लोबल स्टेटस रिपोर्टनुसार, पादचारी आणि दुचाकी किंवा तीनचाकी वाहन चालवणाऱ्यांचा रस्ते वाहतूक अपघातांमध्ये मृत्यू होण्याची शक्यता जास्त आहे, म्हणजे एकूण रस्ते अपघातांपैकी 40 टक्के. अहवालानुसार, रस्ते अपघातात 12 टक्के मृत्यू हे कारस्वारांमुळे होतात. सीट बेल्ट, एअरबॅगमुळे कार चालकाचे प्राण वाचू शकतात. मात्र दुचाकी चालवणाऱ्यांकडे हेल्मेटच असते. तर पादचाऱ्यांना स्वत:चे रक्षण करण्याचे कोणतेही साधन नाही. त्यामुळेच सर्वाधिक अपघात हे पादचारी आणि दुचाकी वाहनांमुळे होतात. 

रस्ते अपघात का होतात?

मद्यप्राशन करणे, भरधाव वेगाने गाडी चालवणे, वाहतुकीचे नियम न पाळणे यामुळे रस्ते अपघात होतात. याशिवाय रस्त्याची खराब अवस्था यांचाही अपघातांमध्ये समावेश आहे. बहुतांश अपघात रात्री उशिरा आणि पहाटे घडतात. कारण वाहतुकीचे नियम पाळले नाहीत.

जर एखाद्या व्यक्तीने हेल्मेट घातले नसेल किंवा सीट बेल्ट घातला नसेल तर त्याला डोक्याला इजा होण्याचा धोका सर्वाधिक असतो. तज्ञांचे म्हणणे आहे की याशिवाय छाती आणि पोटावर जखमा होऊ शकतात. हात, पाय आणि ओटीपोटाची हाडे मोडू शकतात. रस्ते अपघातात अशा प्रकारची दुखापत सामान्य आहे.

डोक्याला, यकृताला गंभीर दुखापत होऊन रक्त येणे थांबले नाही तर तात्काळ मृत्यू होतो. इतर कारणांमध्ये छाती आणि यकृतावर दाब पडल्यामुळे बरगड्या फुटणे यांचा समावेश होतो. दुसरं कारण म्हणजे लवकर दवाखान्यात नेलं आणि योग्य उपचार केले तर जीव वाचू शकतो. किंबहुना, गंभीर रस्ते अपघातातील सुमारे 40 टक्के लोकांना वाचवता येत नाही. छाती, ओटीपोट आणि ओटीपोटाच्या अंतर्गत जखमा सर्वात धोकादायक असतात.

जोपर्यंत बाह्य दुखापतीचा संबंध आहे, बहुधा रक्तवाहिनीवर परिणाम होतो. जिथे व्यक्तीला रक्तस्त्राव होण्याचा जास्त धोका नसतो, कारण अंतर्गत जखमांचा प्रामुख्याने धमन्यांवर परिणाम होतो. ही परिस्थितीही धोकादायक आहे.

जखमींना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये न्या. तुम्ही तुमच्या कार किंवा रिक्षातून पीडित व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असल्यास, त्याचे डोके आणि मान स्थिर आणि सरळ असल्याची खात्री करा. जोपर्यंत तुम्ही दवाखान्यात जात नाही तोपर्यंत त्याचे रक्त वाहत असेल तर ते थांबवण्याचा प्रयत्न करा. अन्यथा लोकांना सीपीआर देखील दिला जाऊ शकतो, परंतु बर्याच लोकांना ते कसे द्यावे हे माहित नसते आणि यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

'गोल्डन अवर'मध्येच नाही तर रुग्णाला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेले पाहिजे. कारण प्रत्येक मिनिटं महत्त्वाचे असतात. याशिवाय भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनामुळे कोणाचा अपघात झाला असेल, किंवा त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या व्यक्तीला गंभीर दुखापत झाली असेल, किंवा किरकोळ दुखापत झाली असेल, तर सर्वांनी लवकरात लवकर रुग्णालयात जावे.