500 mg ची औषधाची गोळी अर्धी तोडली की तिची शक्ती 250 mg होते का?, काय म्हणतात जाणकार

कोरोना काळात लोकं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी वेग-वेगळ्या गोळ्यांचं  सेवन करत आहेत. 

Updated: May 9, 2021, 07:26 PM IST
500 mg ची औषधाची गोळी अर्धी तोडली की तिची शक्ती 250 mg होते का?, काय म्हणतात जाणकार title=

मुंबई : देशात  कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयंकर आहे. राज्यात रूग्णांची संख्या वाढत आहे. तर रूग्ण संख्या वाढत असल्यामुळे औषधांची मागणी देखील वाढली आहे. कोरोना ग्रस्त रूग्णांना तर औषध दिलीचं जात आहेत, पण दुसरीकडे लोकं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी वेग-वेगळ्या गोळ्यांचं  सेवन करत आहेत. त्यामुळे अनेकदा असं होतं आपल्याला हव्या त्या गोळ्या  मिळणं अशक्य होतं.  आपल्याला 250 एमजीच्या डोसची आहे. पण मेडिकलमध्ये 500 एमजीचा डोस आहे. 

अशावेळी आपण 500 एमजीची गोळी अर्धी करून खावू शकतो का? 500 एमजीची गोळी अर्धी करून खाणं खरचं आरोग्यासाठी लाभदायक आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरं डॉ. प्रदीप चौरसिया यांनी दिली आहेत. ते म्हणाले, 'ज्या गोळ्यामध्ये रेघ असेल अशा गोळ्या आपण अर्ध्या करून खावू शकतो. त्यासाठी गोळ्यांवर रेघ असते.'

डॉक्टर पुढे म्हणाले, 'उदाहरण आपल्याला 500 एमजीची गोळी हवी आहे, पण आपल्याकडे 1000 एमजीची गोळी आहे, तर आपण ती गोळी अर्धी करून खावू शकतो. 1000एमजीची गोळी अर्धी करून खाल्यास ती 500 एमजीच्या गोळी प्रमाणे काम करते.' त्यामुळे आता कोणती गोळी आपण अर्धी करून खावू शकतो ही शंका मिटली असेल. 

डॉ. प्रदीप चौरसिया म्हणतात, मध्ये रेघ नसलेल्या गोळ्या आपण अर्ध्या करून खावू शकत नाही. त्यामुळे फक्त मध्ये रेघ असलेल्या गोळ्या आपण अर्ध्या करून खावू शकतो. शिवाय कॅप्सूल देखील अर्ध्या तोडून खावू शकतं नाही.