सद्गुरुंनी गर्भवती महिलांची केली कान उघाडणी? जुन्या काळी होती सोन्यासारखी किंमत

Sadhguru Tips For Pregnant Women : सद्गुरूंनी सांगितले की, पूर्वीच्या काळात गर्भवती महिलांची खूप काळजी घेतली जात होती कारण त्यांच्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम गर्भातील बाळावर होत असे. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.  

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Mar 15, 2024, 05:26 PM IST
सद्गुरुंनी गर्भवती महिलांची केली कान उघाडणी? जुन्या काळी होती सोन्यासारखी किंमत  title=

प्रत्येक स्त्रीसाठी गर्भधारणा हा खूप कठीण आणि विशेष काळ असतो. यावेळी महिलांना अत्यंत सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, आता काळ बदलला असून महिला गरोदर असतानाही प्रवास करतात, कामाला जातात. एवढंच नव्हे तर देश-विदेशात फिरतात, चित्रपट पाहायला जातात. सद्गुरुंनी स्वतः सांगितले आहे की, पूर्वीच्या काळी गरोदर स्त्रियांची खूप काळजी घेतली जायची. गर्भवती महिलांकरिता काही ठराविक नियम होते, जे कटाक्षाने पाळले जायचे. 

मात्र, आता सर्वकाही बदलले आहे. आता गरोदर स्त्रिया ऑफिसला, क्लबला आणि सिनेमाला जात आहेत. आता सर्वकाही बदलले आहे. सद्गुरु म्हणाले की, पूर्वीच्या काळी स्त्रियांना त्या मौल्यवान वस्तू असल्याप्रमाणे वागणूक दिली जात असे. आईने केलेली प्रत्येक गोष्ट बाळापर्यंत पोहोचत असे. याच कारणामुळे महिलांना गर्भधारणेदरम्यान फक्त चांगल्या गोष्टींजवळ राहण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून त्यांचे मूल त्यांच्यापेक्षा चांगले होऊ शकेल. आणि आई-मुलाचे नातेसंबंध अधिक घट्ट होत असे. 

गर्भसंस्कार 

गरोदरपणात महिलांना गर्भ संस्काराशी संबंधित अनेक सल्ले दिले जातात. कारण यामुळे गर्भात वाढत असलेल्या बाळावर संस्कार होत असतात. त्यामुळे गर्भवती महिलांनी गर्भात असलेल्या बाळावर कसे संस्कार करावेत? हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. 

गर्भ आईचा आवाज ऐकतो 

आईच्या पोटातील बाळाला ऐकू येते, त्यामुळे गरोदर मातांना त्यांच्या आजूबाजूला काय बोलले जाते याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. गर्भात असलेले बाळ आपल्या आईचे आणि आजूबाजूचे आवाज ऐकू शकते आणि जन्मानंतरही ते लक्षात ठेवू शकते. अशा परिस्थितीत मातांनी नकारात्मक गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे.

तणाव आणि नकारात्मकता

गर्भधारणेदरम्यान तणाव, चिंता आणि जास्त नकारात्मकता गर्भधारणेचा कालावधी कमी करू शकतात. अनवधानाने वेळेपूर्वी प्रसूती होऊ शकते. याउलट, सकारात्मक दृष्टीकोन आणि सक्रिय आई तिला मानसिकदृष्ट्या सकारात्मक आणि आनंदी ठेवते आणि बाळाचे न्यूरॉन कनेक्शन वाढवते. गर्भसंस्कार या प्राचीन भारतीय शास्त्रानुसार मातांना गर्भधारणेदरम्यान सकारात्मक, आनंदी, तणावमुक्त जीवनशैली जगण्याचा सल्ला दिला जातो.

सात्विक आहार 

गरोदरपणात काय खावे याचा फारसा परिणाम होत नाही, पण कसे खावे हे महत्त्वाचे असते. सात्विक आहार हा केवळ खाल्ल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या प्रकारांबद्दल नाही तर खाण्याच्या दृष्टिकोनाबद्दल देखील आहे, ज्यामध्ये प्रेम, काळजी आणि सावधगिरीने तयार केलेल्या अन्नावर भर दिला जातो.

योगा-ध्यान 

गर्भधारणेदरम्यान योगा करण्यापूर्वी महिलांनी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. इंटरनेटवरील कोणतीही अप्रामाणिक सामग्री हानिकारक असू शकते. गर्भधारणेदरम्यान ध्यान आणि प्रसवपूर्व योगामुळे आई शांत, केंद्रित आणि तणावमुक्त राहण्यास मदत करू शकते. हे शारीरिक सामर्थ्य, लवचिकता आणि एकंदर कल्याण सुधारण्यास देखील मदत करते.