स्टीलची भांडी किंवा डब्यामधील अन्न खाताय? मग ही गोष्ट नक्की माहित करुन घ्या

धातूच्या विशिष्ट भांड्यांमध्ये शिजवलेले अन्न आरोग्यासाठी चांगले असते.

Updated: Nov 26, 2021, 08:58 PM IST
स्टीलची भांडी किंवा डब्यामधील अन्न खाताय? मग ही गोष्ट नक्की माहित करुन घ्या title=

मुंबई : धातूच्या विशिष्ट भांड्यांमध्ये शिजवलेले अन्न आरोग्यासाठी चांगले असते, असे आपण अनेकदा ऐकले आहे. यामुळे आपले शरीर अनेक आजारांपासून दूर राहते. पितळेच्या भांड्यात अन्न शिजवून किंवा धातूच्या भांड्यात खाल्ल्याने त्यातील पोषक घटक अन्नात मिसळतात आणि त्याचा आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो. पितळेच्या भांड्यांमध्ये बनवलेले अन्न तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते असे तज्ज्ञांचे देखील म्हणणे आहे.

प्रत्येकाच्या घरांमध्ये साधारणपणे स्टीलची भांडी वापरली जातात. त्यात शिजवलेले अन्न खाल्ल्याने शरीराला कोणताही फायदा होत नाही. स्टीलची भांडी कार्बन, क्रोमियम आणि निकेल या तीन धातूंनी बनलेली असतात. त्यामुळे त्यात अतिउच्च आचेवर अन्न शिजवल्याने या भांड्यांमध्ये असलेल्या रसायनांवर प्रतिक्रिया होते. यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. 

पितळेच्या भांड्यांमध्ये तयार केलेले अन्न पोषक तत्वांनी परिपूर्ण असते. त्यात बनवलेल्या अन्नामध्ये झिंक जास्त प्रमाणात असते. यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते आणि रक्त शुद्ध होते. पितळेच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक केल्याने त्यातून नैसर्गिक तेल बाहेर पडते, जे अन्नामध्ये मिसळते आणि अन्नाची चव वाढवते.

पितळेच्या ग्लासात रात्रभर पाणी भरून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. हे रोगांशी लढण्यास मदत करते.

पितळेच्या भांड्यांमध्ये खाल्ल्याने श्वसनसंस्थाही मजबूत होते. यामध्ये तयार केलेले अन्न तुम्हाला श्वसनाच्या आजारांमध्ये फायदेशीर ठरेल.

पितळेच्या भांड्यांमध्ये शिजवून खाल्ल्याने त्यातून निघणारे सहस्त्रक तत्व अन्नात मिसळते आणि ते त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. भांडीच्या दर्जाची विशेष काळजी घ्या.

पितळेच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवताना काही गोष्टी लक्षात ठेवा

काही वेळा पितळेच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करणे किंवा खाल्ल्यानेही दुष्परिणाम होतात. या भांड्यांमध्ये आंबट घटक किंवा आम्ल असलेले लिंबू, टोमॅटो किंवा अशा गोष्टींसारखे आम्लयुक्त पदार्थ कधीही बनवू नका. पितळेची भांडी ऑक्सिजनवर प्रक्रिया करून कालांतराने काळी पडतात. ऑक्सिडायझेशन केलेल्या पितळेच्या भांड्यांमध्ये कधीही अन्न शिजवू नका.