मलायका अरोराने का केलं होतं अरबाज खानशी लग्न? स्वत: अभिनेत्रीकडून खुलासा

 जुनी मुलाखत समोर आली आहे. यामध्ये त्यांना सलमान खानबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.

Updated: Nov 4, 2021, 07:46 PM IST
मलायका अरोराने का केलं होतं अरबाज खानशी लग्न? स्वत: अभिनेत्रीकडून खुलासा title=

मुंबई : मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी 1998 मध्ये लग्न केले होते. हे दोघे अनेक बी-टाऊन पार्ट्यांमध्ये एकत्र दिसायचे, परंतु 2017 मध्ये जेव्हा दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला तेव्हा चाहत्यांना आश्चर्य वाटले. हा सर्वांसाठच धक्कादायक निर्णय होता. मलायका आणि अरबाज प्रत्येक कठीण काळात एकत्र दिसायचे. दरम्यान, मलायका अरोराची अरबाज खानसोबतची जुनी मुलाखत समोर आली आहे. यामध्ये त्यांना सलमान खानबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.

साजिद खानच्या शोमध्ये अनिल कपूरने मलायका अरोराला विचारले, 'मलायका, मला तुझ्याकडून हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे की, अरबाज आणि सलमानमध्ये कोण जास्त सुंदर आहे?' त्याने हसत हसत तिने उत्तर दिले, "माझा नवरा अरबाज खान यात काही शंका नाही. तो सुंदर आहे. याच कारणामुळे मी त्याच्याशी लग्नही केले." आता अनिल कपूरने हा प्रश्न का विचारला असेल हे काही कळायला मार्ग नाही. परंतु पुढे अरबाज खान मलिकाच्या उत्तरावर म्हणाला की, "कोणत्याही पुरूषासोबत लग्न करताना या एक गोष्ट करतील की, सुंदर व्यक्तीशी लग्न करतील."

मलाईका यावर उत्तर देत पुढे म्हणते की,  'आता जर अनिल कपूरचा प्रश्न असा असेल तर मी, उत्तर देखील तसेच देईन. मला गंभीर लोक आवडतात. अरबाजही खूप रोमँटिक आहे. ते मला वारंवार सांगतात - बेबी, आपण एकत्र म्हातारे होत आहोत. मला पण त्यांच्या सोबत स्वतःला म्हातारे होताना बघायला आवडते, कदाचित हे देखील आमच्या प्रेमाचे मुख्य कारण असावं."

अभिनेता अर्जुन रामपाल मलाईकाला विचारतो, 'जेव्हा लोक तुला सांगतात की, तू इंडस्ट्रीची फिट आई आहेस तेव्हा तुला कसं वाटते?' मलायका म्हणते, "आता या प्रश्नावर मी काय बोलू? मला हे ऐकून मला खूप आवडते."

मलाईकाचं एकमेकांवर इतकं प्रेम असून देखील हे कपल आता एकमेकांपासून वेगळे झाले आहेत.

एका मुलाखतीत अरबाज खानला त्यांच्या घटस्फोटाचं कारण विचारले असता, तो म्हणाला की, "जेव्हा मी आणि मलायका अरोरा वेगळे होण्याचा निर्णय घेतला तेव्हा आमचा मुलगा फक्त 12 वर्षांचा होता. पण एका पॉईंटनंतर मला वाटू लागलं की आता माझ्यासाठी त्याच्यापासून वेगळं राहणं खूप गरजेचं आहे आणि माझ्या मुलालाही याची जाणीव झाली कारण त्याला घरातील दैनंदिन वातावरणाची चांगली जाण होती. असंही म्हटलं जातं की, मुलांना सगळं काही आधीच कळतं, त्यामुळे माझ्या मुलाचंही तसंच होतं." या व्यतिरीक्त अरबाज खान यावर काहीही बोलला नाही.