Aryan Khan ला वाचवणारा हा एकमेव व्यक्ती नक्की आहे तरी कोण?

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, जो एनसीबीच्या छाप्यात अडकला होता.

Updated: Oct 5, 2021, 11:37 AM IST
Aryan Khan ला वाचवणारा हा एकमेव व्यक्ती नक्की आहे तरी कोण? title=

मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, जो एनसीबीच्या छाप्यात अडकला होता, त्याचं न्यायालयात प्रतिनिधित्व देशातील सर्वात महागडे आणि उच्च प्रोफाईल वकील सतीश मानेशिंदे करत आहेत. सतीश यांनी यापूर्वी बॉलिवूडची अनेक मोठी प्रकरणे लढली आहेत.

बड्या स्टार्सचे नाजूक केसेस लढवल्यानंतर सतीश मानेशिंदे यांच्याकडे 'बॉलिवूडचे समस्यानिवारक' म्हणून पाहिले जाते.

सतीश मानेशिंदे हे पालघर लिंचिंग प्रकरणात विशेष सरकारी वकील देखील आहेत. एनसीबीने मुंबईत क्रूझवर रेव्ह पार्टी करताना आर्यन खानसह अनेक लोकांना अटक केली.

याआधी कोणती प्रकरण हाताळली

सतीश मानेशिंदे यांनीच रिया चक्रवर्तीचा बचाव केला आणि सुशांत सिंह राजपूतशी संबंधित ड्रग प्रकरणात जामीन मिळाला. यापूर्वी त्यांनी संजय दत्त यांच्या 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट खटला लढला होता.

मानेशिंदे यांनी सलमान खानचे काळवीट प्रकरण लढले होते आणि दबंग खानला जामीन मिळाला होता.