एक्स गर्लफ्रेन्ड अनुष्काच्या लग्नानंतर तिच्याबद्दल बोलला रणवीर

रणवीर सिंह आणि अनुष्का शर्माने एकत्र बॉलिवूड करिअरला सुरुवात केली होती. दोघांनीही यशराज बॅनरच्या ‘बॅन्ड बाजा बारात’ मध्ये एकत्र काम केलं होतं.

Updated: Dec 26, 2017, 08:44 PM IST
एक्स गर्लफ्रेन्ड अनुष्काच्या लग्नानंतर तिच्याबद्दल बोलला रणवीर title=

मुंबई : रणवीर सिंह आणि अनुष्का शर्माने एकत्र बॉलिवूड करिअरला सुरुवात केली होती. दोघांनीही यशराज बॅनरच्या ‘बॅन्ड बाजा बारात’ मध्ये एकत्र काम केलं होतं. दोघांची केमिस्ट्रीही पसंत केली गेली होती. त्यानंतर दोघांचं अफेअरही चर्चेत होतं. पण त्यांनी तेव्हा ते कधीही मान्य केलं नव्हतं. आता विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या लग्नानंतर रणवीर अनुष्काबद्दल बोलला आहे. 

काय म्हणाला रणवीर?

याआधीही रणवीर अनुष्का शर्माबाबत म्हणाला होता की, ती सुंदरता, टॅलेंट आणि हुशारीचं बेजोड मिश्रण आहे. रणवीर आताही तिची प्रशंसा करतो. तो नुकतास फोर्ब्स मॅगझीनसोबत बोलताना म्हणाला की, ‘हे बघणे खरंच चांगले आहे की, अनुष्का इतक्या पुढे गेली आहे. ती एक अभिनेत्री म्हणून नेहमीच चांगली होती, पण तिचा क्राफ्टही खूप सॉलिड राहिला आहे. ती स्वत:च्या मेहनतीने इथपर्यंत पोहोचली आहे. ती तिच्याबाबत आणि आपल्या आवडीबाबत स्पष्ट आहे’.

मुंबईत रिसेप्शन

विराट आणि अनुष्काने ११ डिसेंबरला इटलीत लग्न केलं. दोघेही चार वर्षांपासून रिलेशनमध्ये होते. त्यानंतर त्यांनी दिल्लीत २१ डिसेंबरला रिसेप्शन दिलं. आता मुंबईत त्यांचं रिसेप्शन पार पडत आहे. या रिसेप्शन पार्टीला बॉलिवूडसह अनेक दिग्गजांची उपस्थिती असणार आहे.