'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींनी अशा पद्धतींनी केले लग्न...वाचून तुम्ही चक्रवाल

आज आम्ही तुम्हाला त्या कोणत्या अभिनेत्री आहेत ज्यांना घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न करावे लागले याविषयी माहिती देणार आहोत.

Updated: Nov 2, 2022, 11:40 PM IST
'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींनी अशा पद्धतींनी केले लग्न...वाचून तुम्ही चक्रवाल title=
these famous Bollywood actresses got married in such ways you will be shocked nz

Evergreen Bollywood Actress : बॉलिवूडमध्ये लग्न म्हटलं की भव्य दिव्य सोहळ्यांचे आयोजन केले जाते. या सोहळ्यांमध्ये मोठमोठ्या पार्टीजचे आयोजन केले जाते. मेहंदीपासून रिसेप्शनपर्यंत सर्व काही येथे थाटामाटात साजरे केले जाते, चाहते देखील त्यांच्या या आंनदात सामील होतात. परंतु अशा अनेक देखील काही अभिनेत्री आहेत ज्यांनी नाईलाजाने घरातून पळ काढावा लागला, गुपचूप लग्न करावे लागले किंवा मध्यरात्री मंदिरात लग्नाच्या विधी पूर्ण कराव्या लागल्या. आज आम्ही तुम्हाला त्या कोणत्या अभिनेत्री आहेत ज्यांना घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न करावे लागले याविषयी माहिती देणार आहोत. (these famous Bollywood actresses got married in such ways you will be shocked nz)

हे ही वाचा - परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान, पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Amrita Singh: अमृता सिंग आणि सैफ अली खान यांच्या लग्नाची आज ३ दशकांनंतरही जोरदार चर्चा आहे. 1991 मध्ये काही भेटीनंतरच अमृता आणि सैफने लग्नाचा निर्णय घेतला होता आणि गुपचूप सात फेरेही घेतले होते. दोघांनीही ही गोष्ट घरच्यांपासून लपवून ठेवली होती. मात्र, 13 वर्षांनी त्यांचा घटस्फोटही झाला.

हे ही वाचा - Andheri By Poll Election! अंधेरी परिसरात 1 नोव्हेंबरपासून 3 नोव्हेंबरपर्यंत संचारबंदी लागू

 

Divya Bharti: दिव्या भारतीने लहान वयातच सर्व काही मिळवले होते. अगदी साजिद नाडियादवालाशी लग्न केले. पण ही गोष्ट त्याने नेहमी लपवून ठेवली. लग्नानंतर काही महिन्यांनी तिचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतरच त्यांच्या लग्नाचे रहस्य उघड झाले.

Bhagyashree: मैंने प्यार किया या चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री भाग्यश्रीने देखील कशाचीही पर्वा न करता घरातून पळून जाऊन गुपचूप लग्न केले. भाग्यश्री यांचे कुटुंबीय लग्नाच्या विरोधात होते. तरीही धाडस करत हा निर्णय तिनं घेतला.

हे ही वाचा - 'दाल में कुछ काला है या पुरी दालच काली है...' असं का म्हणाल्या सुषमा अंधारे

 

Padmini Kolhapure:  आपल्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेचे हृदय प्रदीप शर्मासाठी धडधडत होते, मात्र घरच्यांना हे नाते पटले नाही तेव्हा अभिनेत्रीने घरातून पळ काढला आणि कोणालाही न सांगता प्रदीपशी लग्न केले. आजही दोघे एकत्र आहेत.

हे ही वाचा - शिवसेना कार्यकर्त्यांनी उधळपट्टी केल्याचा VIDEO आला समोर 

 

Rekha : रेखाचे लग्न 1991 मध्ये मुकेश अग्रवालसोबत झाले होते, पण तुम्हाला माहित आहे का की, या दोघांनीही मंदिरात गुपचूप लग्न केले होते. रेखाने रात्री उशिरा मुकेश अग्रवालसोबत मंदिरात सात फेरे घेतल्याचे सांगितले जाते, ज्याची तिच्या घरच्यांनाही माहिती नव्हती.