तब्बल १० वर्षांनी सलमान खान आणि अमिताभ बच्चन येणार एकत्र

'टायगर जिंदा है' या चित्रपटानंतर सलमान खान येत्या ईदला 'रेस ३' हा चित्रपट घेऊन येणार आहे.

Updated: Aug 31, 2017, 05:15 PM IST
तब्बल १० वर्षांनी सलमान खान आणि अमिताभ बच्चन येणार एकत्र  title=

मुंबई : 'टायगर जिंदा है' या चित्रपटानंतर सलमान खान येत्या ईदला 'रेस ३' हा चित्रपट घेऊन येणार आहे.

जॅकलिन फर्नांडीससोबत सलमान खान 'रेस ३' या आगामी चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात करणार आहे. 

रेमो डिसुजा दिग्दर्शित 'रेस३' मध्ये कोणते कलाकार असणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र 'बॉलिवूडलाईफ.कॉम' ने दिलेल्या माहितीनुसार सलमान खान सोबत अमिताभ बच्चन या चित्रपटात झळकण्याची शक्यता आहे. 
२००८ साली प्रदर्शित झालेल्या ‘गॉड तुस्सी ग्रेट हो’या चित्रपटात सलमान खान आणि अमिताभ बच्चन शेवटचे एकत्र दिसले होते. त्यानंतर रेमो डिसुजाने त्याच्या आगामी चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांच्याकडे याबाबत विचारणा केली आणि बिग बींनीही या ऑफरला होकार दिल्याचे समजते आहे. 

सलमानच खाने वडील व पटकथाकार,लेखक सलीम खान यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेक वर्षे काम केले आहे. सलीम-जावेद या जोडीने बिग बींच्या ‘दीवार’,‘जंजीर’,‘मजबूर’,‘त्रिशूल’आणि ‘शोले’या हिट चित्रपटांच्या कथा लिहिलेल्या. पण सलीम-जावेद या जोडीत वाद झाल्यानंतर बिग बींनी जावेद अख्तर यांच्यासोबत काम सुरू ठेवले. त्यानंतर खान आणि बच्चन कुटुंबीबीयांमध्ये दुरावा आला होता. पण 'रेस ३'च्या माध्यमातून ही कुटुंब पुन्हा जवळ येण्याची शक्यता आहे.